डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महाराष्टराचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत चैत्यभूमी येथे भेट दिली . या दरम्यान मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चैत्यभूमी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि एक व्यक्ती किती मोठं परिवर्तन घडवून आणू शकते हे डॉ. बाबासाहेब आंबेकर यांनी दाखवून दिले . त्यांनी लिहलेल्या संविधानामुळे देशात समतेचे राज्य निर्माण करण्यास मदत झाली .
भगवान गौतम बुद्धाचा शिकवणीतून मिळालेला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अधोरेखित केलेला अत्त दीप भव हा संदेश मानवाचा सर्वोत्तम कल्याणाचा संदेश आहे.
या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचा अर्थकारणाला एक महत्वाची दिशा दिली .त्यांनी भारतात केंद्रीय बँकेचे महत्व अधोरेखित केले . त्यांचा विचारांचा आधार घेत भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापन करण्याचा निर्णय झाला .
अश्या प्रकारचा भावना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त मुंबई येथील चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्या.







