वर्षभर परीक्षेची तयारी करून, जर का परीक्षेचा दरम्यान गडबड होत असेल आणि त्यामुळे विध्यार्थ्यांना परत त्याच परीक्षेची तयारी करावी लागत आहे तर ,यामुळे विद्यार्थ्यांचा समस्या ह्या अधिक वाढतात ..
अनेक मुलं या काळात अनेक समस्यांचा सामना करतात. अनेक मुलं कसेबसे तडजोड करून भाड्याचा खोल्यांमध्ये राहून किंवा हॉस्टेलची फी कशीबशी भरून शिकत असतात , कित्येकदा ती मुलं एकदाच जेवण करून दिवस काढतात कारण दोन वेळ जेवायला तेवढे पैशे नसतात.
कारण अनेक मुलं मुली हे गरीब घरांतून किंवा सामान्य घरातून आलेली असतात, त्यांचे आई वडील सुद्धा त्यांना तडजोड करून पैशे पाठवत असतात . हि सत्य परिस्थिती असते .
आणि या काळात ह्या प्रकारे ह्या तरुण मुलां मुलींचा सुद्धा मोठा संघर्ष सुरु असतो आणि परीक्षेदरम्यान जर का भ्रष्टाचार होत आहे किंवा परीक्षेचे पेपर लीक होत आहे तर त्यांचा समस्येत नक्कीच वाढ होते त्यांचा मानसिक ताण वाढतो त्यांना प्रचंड निराशा हि येते . .
त्यामुळे परीक्षांमध्ये पारदर्शकता येणे आणि असणे महत्वाचं आहे. नीटचा परीक्षेदरम्यान झालेल्या गडबडीमुळे अनेक मुलांना मानसिक तणावातून जावं लागलं आणि ह्यामध्ये शिक्षण विभागाचं अपयश आपल्याला दिसत. .
अशा प्रकारच्या कारभारांवर शिक्षण विभाग नियंत्रण आणू शकलं नाही आणि मानसिक तणावामुळे आणि नैराश्यामुळे काही मुलांनी आपलं जीवन त्यागलं , हि अत्यंत दुर्दवी अशी बाब होती .
त्यानंतर काहीच दिवसांनी महाराष्ट्रातील टीईटी परीक्षेच्या वेळी भोंगळ कारभार; हे परत शिक्षण विभागाचं अपयश दाखवते आणि कश्या प्रकारची परिस्थिती या दिवसांत शिक्षण विभाची आहे हे या वरून आपल्याला समजते .
अनेक विद्यार्थ्यांची वर्षे आणि त्यांचे परिश्रम वाया जाऊ नये; त्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, ह्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आणि प्रशासनाची आहे .
जर शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणली गेली, तर भविष्यात आपल्याला सकारात्मक बदल दिसू शकतात.
मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये . जर ते पुढे गेले, तर समाज आणि आपल्या देशाची सुद्धा प्रगती होते.







