पावसाळा सुरू होत आहे; हळूहळू आता शेतकऱ्यांचा कामाला सुद्धा सुरवात होईल . या दरम्यान शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असते;
त्यांना बैल खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असते; जर त्यांच्याकडे बैल नसतील, तर त्यांना ते भाड्याने आणावे लागतात; त्यांना शेतात पेरणी करण्यासाठी पैशांची गरज असते; त्यांना गावातील दुकानांमधून शेतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असते; त्यांना शेतात जर का मजुरांची गरज असेल तर मजूर लावण्यासाठी सुद्धा त्यांना पैसे लागतात .
त्याचबरोबर , त्यांना घर चालवण्यासाठी, मुलांसाठी, घरात दिवे लावण्यासाठी; आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची गरज असते. पण गरीब शेतकरी शेतात कितीही राबले तरी दरवर्षी एवढे पैसेसुद्धा जमवू शकत नाहीत हि परिस्थिती अनेक शेतकऱ्यांची आपल्याकडे असते .
आपल्या देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो नेहमी आणि त्यांचा माध्यमातून प्रचंड नफा मिळवण्या मध्ये मोठे व्यापारी हे नेहमी नेहमी समोर असतात आणि ते पुढारी सुद्धा समोर असतात जे ह्या शेतकरयांचा नावाने येणारा पैसे हा गटवून टाकतात .
आपल्याकडे दरवर्षी राज्य सरकारांना शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी लागते ; आता आमचे शेतकरी बंधू सुद्धा काय करणार वर्षभर काम करून सुद्धा यांना काही फायदा हा होत नाही त्यामुळे ते हतबल असतात .
कारण त्यांनी शेतामध्ये पिकवलेल्या पिकांचा खर्च हा कधीच वसूल होत नाही, आणि जरी झाला तरी, बाजारात बसलेले दलाल आणि व्यापारी त्यांची फसवणूक करून त्यांनी पिकवलेला माल हा अत्यंत कमी दरात विकत घेतात .
त्यामुळे जितका खर्च त्यांना एखाद उत्पन्न घेण्यासाठी लागलेलं असेल तेवढा सुद्धा खर्च हा त्यांचा निघत नाही ,ना त्यांचे त्यातून अधिक पैसे वाचू शकतात; त्यामुळे हातात पैसाच शिल्लक न राहिल्यामुळे ते ना घर चालवू शकत, ना आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत; ना ते आपल्या मुलांना एका वेळच जेवण देऊ शकत.
तर या कारणांमुळे आपल्या देशातील अश्या प्रकारे अनेक शेतकरी कुटुंबे दररोज उपाशीपोटी झोपतात, आणि हि आपल्या देशातील अनेक गरीब शेतकऱ्यांची सत्य परिस्थिती आहे.
नाहीतर, आपल्या देशातील शेतकऱ्यांमध्ये इतकी क्षमता आहे की, जर त्यांची प्रगती झाली, तर देशाचीही प्रगती होऊ शकते; परंतु साथ, सहकार्य आणि शिक्षणाशिवाय त्यांच्या जीवनात बदल घडून येणे हि खूप कठीण बाब आहे .







