गायी आणि म्हशी किती मौल्यवान असतात बघा. त्या घरी असल्या तर पैशांची बचत मोठ्या प्रमाणात होऊ शकते गायी आणि म्हशीं मुळे आपल्याला दूध, दही, तूप आणि ताक या प्रकारचा गोष्टी मिळतात त्याचबरोबर बरेच लोकं त्यांच्यापासून मिठाईसुद्धा बनवतात.
गुरांपासून आपल्याला शेण उपलब्ध होते आणि त्याचा उपयोग आपण इंधन म्हणून करू शकतो, ज्यामुळे अनेक सामान्य परिवारांची खूप मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होऊ शकते. आजकाल अनेक लोकांना देशाचा अनेक भागात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे असं चित्र आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर सिलिंडर खरेदी करण्यासाठी लोकं कडक उन्हात लांब रांगेत उभे असलेले दिसतात. म्हणून, अशा कठीण काळात, जर कोणाच्या घरी गायी , म्हशीं किंवा बैलं असेल, तर त्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात दूर होऊ शकतात .
ज्या शेतकऱ्यांकडे किंवा गावातील लोकांकडे गायी, म्हशी असेल त्या गाई म्हशींना वासरे सुद्धा होतात आणि ती वासरे मोठी होऊन बैलं बनतात, आणि हे बैलं नंतर शेतीसाठी कामात येतात , तर कधीकधी बाजारात माल वाहून नेण्यासाठी किंवा शेजारच्या गावांमध्ये कामासाठीही ते बरेच उपयुक्त ठरतात. त्यामुळे त्यांचा उपयोग करून मोठ्या प्रमाणात पैशांची बचत करता येऊ शकते. त्याचबरोबर आजकाल बघा मोटार वाहनांच्या किमती गगनाला भिडलेल्या दिसतात त्याचबरोबर वाहनांची संख्या सुद्धा वेगाने वाढत असल्याचे चित्र लोकांना बघायला मिळते आणि त्यामुळे लोकं सुद्धा वाहतूक कोंडीमुळे अनेक तास रस्त्यांवर अडकून पडलेले आहे असं चित्र बघायला मिळत.
त्यामुळे जर गाव खेड्यातील किंवा छोट्या शहरांतील लोकांकडे गुरे वगैरे असेल, तर ते त्यांच्या मदतीने त्यांची बरीच कामे करू शकतात. देशातील अनेक गावांमध्ये आणि खेड्यांमध्ये आता सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकं याप्रकारे आपले काम करतात . ती बैलं शेतात सुद्धा उपयोगी येतात आणि त्यांचा उपयोग सामान नेण्या आणण्यासाठी सुद्धा केला जातो.
त्यांच्या मदतीने तिथली लोकं अनेक दैनंदिन कामे सहजपणे करताना दिसतात असं चित्र सुद्धा आपल्याला बघायला मिळत आणि त्यामुळे त्या लोकांचा इंधनाचा खर्च सुद्धा अनेकदा वाचताना दिसतो त्याचबरोबर मोटारगाडी घेण्याचा सुद्धा खर्च त्यांचा वाचतो आणि त्यामुळे लाखो रुपयांची गाडी खरेदी करण्यावर वाचलेले पैसे ते एखाद्या चांगल्या कामासाठी किंवा परिवाराचा विकासाठी ते पैसे ते उपयोगात आणू शकतात .
त्याचबरोबर आजकाल मोटार गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा प्रमाण बराच वाढताना दिसत त्यामुळे शहरातही लोकं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषणाने त्रस्त आहे हे चित्र बघायला मिळत त्याचबरोबर तापमान वाढण्यामुळे व प्रदूषणाच्या परिणामांमुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे असं चित्र बघायला मिळत . सोबतच लोकांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे हे सुद्धा चित्र बघायला मिळत. त्याचबरोबर वातानुकूलित मोटारींमधून प्रवास करण्यामुळे इंधन सुद्धा मोठ्या प्रमाणात जळताना दिसते .
पण ते शहरं बघा किंवा गावे बघा जिथे कारखाने आणि वाहने यांची संख्या कमी आहे, तिथे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी आहे आणि त्यामुळे लोकांच्या समस्या सुद्धा कमी आहेत असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळत .
तर, पूर्वी अनेक लोकांकडे गायी, म्हशी आणि बैलं असायचे . बैलगाड्या आणि घोडागाड्या असायचा . तेव्हा मोटार वाहने, दुचाक्या आणि प्रदूषण सुद्धा कमी होत. आता मात्र रस्त्यांवर माणसांपेक्षा जास्त मोटार वाहने दिसतात . प्रदूषणाबद्दल तर विचारूच नका, लोक खूप त्रस्त असतात . उन्हाळ्यात त्यांची परिस्थिती आणखी कठीण असते . त्यात भर म्हणजे, इंधनाचे भाव वाढल्यामुळे आणि गॅसचे भाव वाढल्यामुळे , लोकांना पुन्हा चिंता वाटू लागते.
पण ज्यांच्या घरी गायी, म्हशी आणि बैलं वगैरे आहेत त्या लोकांना समस्या जरा कमी आहेत असं बघायला मिळत . त्यामुळे अश्या प्रकारची कुटुंबे इंधनासाठी लांब लांब रांगेत कमी उभी राहताना दिसतात ना त्यांना गॅससाठी अनेक आठवडे किंवा महिनाभर वाट पाहावी लागते त्यामुळे त्यांचा या प्रकारे बराच त्रास हा वाचताना दिसतो .







