आपल्याकडे उन्हाळ्याची सुरुवात झाली कि आपल्याला बघायला मिळते हळूहळू लोकांची आणि प्राण्यांची परिस्थिती हि अधिक कठीण होत आहे .उन्हाळ्याचा सुरवाती सोबतच तापमानात हळूहळू वाढ बघायला मिळते आणि सर्वांचीच परिस्थिती हि अधिक कठीण होताना आपल्याला जाणवते .
वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणात लोकं पाण्यासाठी संघर्ष करताना दिसतात. उन्हाळ्यात अनेक प्राण्यांनाही बराच संघर्ष करावा लागतो, कारण गाव असो किंवा शहरं असो पाण्याचा समस्यांमुळे त्या लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आणि प्रचंड भटकंती करून सुद्धा ना त्यांना चारा मिळत ना पाणी अश्या प्रकारची समस्या हि बऱ्याच ठिकाणी असते .
जंगलातील वन्य प्राण्यांसाठीही परिस्थिती हि कठीण असते .जिथे पाण्याची तीव्र टंचाई अनेक भागात जाणवताना दिसते .
त्याचबरोबर या दिवसांत त्यांना चाऱ्याचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो . गावात भटकंती करून सुद्धा त्यांना चारा मिळत नाही ज्यामुळे प्राण्यांची अवस्था अधिकच कठीण होते .
त्यामुळे, उन्हाळ्याच्या या दिवसांत जर आपण आपल्या गावात वगैरे किंवा रस्त्यांच्या कडेला, गावांमध्ये आणि अगदी जंगलातही या प्राण्यांसाठी पाण्याची सोय केली तर या दिवसांत अनेकांची मदत हि होऊ शकते .
हे प्राणी ह्या दिवसांत दिवसभर सावलीच्या शोधात भटकत असतात; खूप भटकंती करूनही त्यांना कुठेच सावली मिळत नाही किंवा पाणीही उपलब्ध होत नाही. आज अनेक भागांमध्ये अश्या प्रकारची परिस्थिती आहे. जर आपण आपल्या शहरात फेरफटका मारला, तर आपल्याला हे नक्कीच अनुभवायला मिळेल .
त्याचबरोबर शहरांत सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फक्त सिमेंट-काँक्रीटच्या इमारती बघायला मिळतात आणि लोकांना या कॉंक्रिट च्या जंगलात कुठेच मात्र थंडगार विसावा देणारी सावली मिळत नाही त्यामुळे अनेक लोकांचा समस्ये मध्ये वाढ होताना दिसते .
त्यामुळे आज आपल्याला समजणे आवश्यक आहे कि आपण लोकांसाठी आणि प्राण्यांसाठी सुद्धा क्षणभर थांबून विसावा घेण्यासारखी कोणतीही जागा ठेवलेली नाही,आणि या अधोगतीचे कारणे आपल्याला शोधणे आवश्यक आहे .







