गावात बैलांची काही कमी नाही. शेतात काम करणारे प्रामाणिक बैलं असतात.
गावात निरर्थक पणे फिरणारे सुद्धा बैलं असतात. मालकाने वार्यावर सोडून दिलेले सुद्धा बैलं असतात.
काही बैलं उंच असतात. काही बैलं मध्यम उंचीचे असतात तर काही बैलांची उंची बर्यापैकी असते.
काही बैलं शेतात कामात लागलेले असतात तर काही बैलं मालवाहतूक करण्याच्या कामात येतात तर काही बैलं
रस्त्यावर ताणून बसायला तयार झाले की काय त्यांना बघून कधी कधी अस वाटत.
यांना रस्त्यावर बसलेले असेल तर तर गाडी घोड्यांची कधी भीती वगैरे वाटतेय अस त्यांना बघून आपल्याला वाटणार नाही.
मात्र वाहन चालकांना त्यांना बघून, आपन कुठे आपले वाहन घेऊन त्यांच्यावर आदळणार तर नाही ना याची शंका येते .
त्यामुळे वाहनचालक सजगतेने त्यांना त्रास न देता वाट काढत समोर जात असतात.
अनेकदा त्यांच्या रस्त्यावर बसल्या असल्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो.
आणि या दिवसांत शहरांत चाऱ्याचा प्रश्ण निर्माण झाल्यामुळे आणि शहरीकरण वेगाने होत असल्यामुळे आणि हिरव्या चाऱ्याचा जागा किंवा मैदाने कमी होत जाण्यामुळे गुरांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत.
इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात त्याचबरोबर.
शहरांतील आजूबाजूच्या शेतीच्या जमिनी सुद्धा आता हळूहळू लोकांच्या आणि शेतकर्यांच्या त्यांच्या हातून जाताना दिसतात आणि त्या जागी मोठमोठ्या इमारती उभ्या होतांना दिसतात.
पाळीव आणि गवत खाणार्या प्राण्यांचा चरण्यासाठी च्या समस्या आज मोठ्या प्रमाणात निर्माण होतांना दिसतात. त्यामुळे चाऱ्याचा शोधात यांना वणवण भटकतांना बघायला मिळते.
चारा उपलब्ध नसल्यामुळे व चाऱ्याची किम्मत अधिक असल्यामुळे ज्यांच्याकडे गाई म्हशी किंवा गुरे आहेत
ते आपल्या प्राण्यांना चरण्यासाठी गावात मोकळे सोडून देतात आणि ते या प्रकारे भटकतांना दिसतात आणि कित्येकदा वाहतुकीमध्ये सापडल्यामुळे यांचा अपघात सुद्धा होतोय हे सुद्धा आपल्याला बघायला मिळते.
तर ही समस्या या दिवसांत या प्राण्यांसाठी मोठी आहे. आता प्राण्यांना हिरवा चराच उपलब्ध नसल्यामुळे ते सुद्धा काय करतील आणि जर तो दुकानांत वगैरे विकायला ठेवला आहे तर त्याची किम्मत मोठी असते तर एवढी किम्मत देऊन प्रत्येकच गरीब माणूस किंवा पाळीव जानवर ठेवणारा व्यक्ति आपल्या जनावरांना चारा खाऊ घालू शकत नाही.
तर ह्या प्राण्यांसाठी गवताळ मैदाने वाचवणे आज आवश्यक आहे अस आज आपल्या लोकांना आणि शासनाला सुद्धा कळणे आवश्यक आहे.
नाहीतर येणार्या काळात लोकांनी आपली जनावरे कश्या प्रकारे जगवायची हा प्रश्ण निर्माण होईल आणि काय गोरगरीब माणूस किंवा शेतकरी गुरे पाळू शकेल की नाही हा सुद्धा मोठा प्रश्ण असेल.






