काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
आज प्रत्येक घरात लोकं बोअरवेल खणत आहेत. आपण पाहतो की, जरी त्यांनी १५० फूट किंवा त्याहून थोडी अधिक खोल बोअरवेल खणली, तरी काही वर्षांतच या कुटुंबांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यांना पुन्हा बोअरवेल अधिक खोल खणण्यासाठी त्या लोकांना बोलवावे लागते; आणि ५०० फुटांपर्यंत बोअरवेल खणल्यानंतर सुद्धा पुढे येणाऱ्या काळात त्यांना कधी पाणी टंचाईचा सामना करावा लागेल हे काही सांगता येत नाही.
कारण , एकाच परिसरात मोठ्या प्रमाणात लोकं पाण्याची मागणी करत आहेत असं दृश्य असत आणि प्रत्येक घरात या दिवसांत बोअरवेलचा वापर केला जात असल्यामुळे आणि प्रत्येकजण पाण्याची मागणी करत असेल आणि बोअरवेल खणत असेल आणि शहरांमध्ये मोठ्या इमारतींची संख्याही प्रचंड असून तिथेही पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असेल आणि दुसरीकडे लोकसंख्याही बेसुमार वेगाने वाढत असेल, तर पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते .
जर उन्हाळ्यात शहरांमध्ये अनेक घरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. एकाच क्षेत्रात राहणारे खुपशे कटुंब बोअरवेलचा वापर करत असतात आणि त्याच परिसरात राहणारे इतर कुटुंब सुद्धा बोरवेल किंवा त्यांचा कडे विहिरी असता मात्र या क्षेत्रात राहणाऱ्या अनेक लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.
कारण, जमिनीखाली सुद्धा खूप अधिक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे अशी काही परिस्थिती नसते, ज्यामुळे सातत्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी करणाऱ्या मोठ्या लोकसंख्येसाठी ते सतत पुरेल .
जमेनीवरील पाणी बाष्पीभवनाच्या प्रक्रियेद्वारे वर जाते म्हणजे ढगांमध्ये रूपांतरित होते आणि हे ढग जेव्हा थंड होतात तेव्हा ठराविक कालावधी नंतर आपल्याला त्यातील पाणी पावसाचा रूपात मिळते .
मात्र हे पाणी त्या काळात जमिनीमध्ये योग्य प्रमाणात ‘झिरपणे सुद्धा आवश्यक असत त्याच्या बरोबर दुसरीकडे अतिशय वेगाने होणारी ‘बाष्पीभवनाची’ प्रक्रिया या दिवसांत घडत असल्यामुळे, आणि जमिनीची धूप (soil erosion) सुद्धा वेगाने होत असल्यामुळे. त्याचे वाईट परिणाम आपल्याला सभोवताली या दिवसांत बघायला मिळतात .
जर का जमिनीची मोठ्या प्रमाणात होणारी धूप आणि वेगाने होणाऱ्या बाष्पीभवनावर नियंत्रण ठेवण्याचे आपल्याकडे कोणतेही माध्यम उपलब्ध नसेल, तर सूर्याची किरणे बाष्पीभवनाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेत राहतील आणि मोठ्या प्रमाणात वर्षभर होणाऱ्या जमिनीचा धुपेमुळे तिथला परिसर हा भयंकर तापेल आणि वाळवंटसदृश दिसेल आणि तिथे लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागेल अशी काही परिस्थिती असेल .
त्यामुळे ही एक मोठी चिंतेची बाब आहे. प्रत्येक भागात लोकांना पाण्याची गरज आहे आणि पाण्याची मागणीही प्रचंड आहे; परंतु मोठ्या संख्येने लोकं याविषयी जागरूक नाहीत किंवा असेल तरी निसर्गाचं संतुलन साधण्यासाठी मात्र ते पुढे येताना दिसत नाही.
साध्या आणि सहज पद्धतीने आपण आपले प्रश्न सोडवू शकतो आणि आपण आपल्या सभोवतालचे वातावरण सुंदर बनवू शकतो आणि त्याद्वारे येणाऱ्या काळात प्रत्येक घरात पाणी उपलब्ध होऊ शकते; ज्यामुळे आपल्याला दोन,तीन दिवसांनी येणाऱ्या पाण्याच्या टँकरची वाट पाहत बसाव लागणार नाही.
आणि जर का येणाऱ्या काळातही अश्याच प्रकारची परिस्थिती कायम राहिली तर जमिनीखाली आपण कितीही खोलवर खणल, तरी पाण्याचा एक थेंबही तिथे आढळणार नाही आणि प्रत्येक क्षेत्रातील लोकं पाण्यासाठी संघर्ष करताना दिसून येतील. परंतु, आपल्या जीवनात अश्या प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याआधी , आपण स्वतःच्याच भल्यासाठी या क्षेत्रात काम करून स्वतःला मदत करू शकतो.







