बिहार मधील गया येथे नुकताच भारताचा पहिल्या आयपीएस महिला पोलीस अधिकारी किरण बेदी यांनी भेट दिली . त्या येथे गयाजी येथील बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट च्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आल्या होत्या .
या दरम्यान त्या मार्गदर्शन करताना म्हणाल्या, चांगला अधिकारी तोच असतो जो लोकांमध्ये दिसतो . त्याचबरोबर ख्रुची वर बसून शासन चालवता येत नाही त्यासाठी आपल्याला जमिनीवर सुद्धा काम करावं लागत . आणि जोपर्यंत तुम्ही जमिनीवर उतरून थेट लोकांना भेटत नाही तो पर्यंत तुम्हाला सुद्धा जाणीव होणार नाही कि प्रत्यक्षात काय त्यांचा समस्या आहेत,त्यामुळे तुमचे उपाय सुद्धा व्यर्थ असतील .
त्याचबरोबर , फायलींमधील आकडेवारी आणि अहवाल हे सत्य परिस्थिती दाखवू शकत नाही . कित्येकदा खरे चित्र हे गावांमध्ये, खेड्यांमध्ये आणि रस्त्यांवर आणि अनेको वस्त्यांमध्ये दिसते . त्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या , जे प्रशासन पुढाकार घेते आणि वाट पाहणारे नाही तेच प्रशासन प्रभावी ठरते .
त्यामुळे जर अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लोकांशी संपर्क साधला, तर समस्या अधिक वेगाने समोर येतील आणि त्यावर उपायही सापडतील.
याच दरम्यान त्या अधिकाऱ्यांना संबोधतांना म्हणाल्या , जनसंपर्क हा प्रशासनाचा कणा आहे , जनतेपासून वाढत्या दुराव्यामुळे विश्वासाला तडा जाते आणि विश्वासाला तडा गेला तर प्रशासन हे कमकुवत होते .त्यामुळे, प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित संवाद राखला पाहिजे ह्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी या दरम्यान केलं .







