पतंगांचा हंगाम सुरू झाला आहे. या दिवसांत दुकाने विविध रंगांच्या मोठ्या आणि छोट्या पतंगांनी भरलेली दिसतात आणि मुलं सुद्धा त्या पतंगा खरेदी करतांना आणि घोळक्यात येऊन गोंधळ करतांना दिसतात.
आणि जर तुम्ही या दिवसांत आकाशाकडे बघितल तर तुम्हाला पक्षी कमी उडतांना दिसतील आणि पतंगा वेग वेगळ्या रंगांच्या अनेक आकाशात उडतांना दिसतील आणि हे दृश्य खरच चेहर्यावर हसू आणणार आणि आनंद देणार असतं कारण आपल्याला आपले बालपणातील दिवस तेव्हा नक्कीच आठवतात.
या दिवसांत आकाश रंग बे रंगी पतंगांनी भरलेले दिसते, त्या पतंगाना आकाशात उंच उंच उडतांना बघून आकाशात रंगबेरंगी रंगांचे पक्षीच उडत आहेत अस काही क्षणासाठी आपल्याला वाटून जातं.
मुलं आणि तरुणही मोठ्या प्रमाणात पतंग उडवतांना या दिवसांत दिसतात.
या दिवसांत प्रत्येक घराच्या छतावर मुलांच्या टोळ्या पतंग उडवतांना दिसतात, काही हातात चक्री पकडुन दिसतात, तर काही हातात पतंगाचा मांजा पकडून आहेत अस दिसत आणि त्यांचे छोटे छोटे मित्र सुद्धा त्यांच्यासोबत दिसतात, ते कधी मोठ्याने ओरडताना दिसतात तर कधी जल्लोष करतांना आणि कधी नाचत असताना दिसतात.
विरोधी पक्षाची पतंग कटली असेल तर ते आनंद साजरा करण्यासाठी अश्या प्रकारे जल्लोष करतात कदाचित किंवा अस असू शकते. जर आपल्या पक्षातील पतंग कटली तर ते त्या पतंग पकडण्यासाठी कदाचित तिथे असतात आणि आपल्या सोबत्यांना पतंग उडवताना आणि गोंधळ घालताना पाहणे हा देखील एक मनोरंजक अनुभव असतो तर हे सुद्धा त्यामागील कारण असू शकते.
कधीकधी, पतंग कटल्यानंतर, त्याचे धागे जमिनीवर लटकलेले किंवा एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीत लटकलेले दिसतात.
कधीकधी, पतंग कटल्यानंतर , पतंग आकाशात हेलकावे खाताना आणि डगमगताना दिसते, तर कधी झाडावर लटकलेली, तर कधी इमारतीवर लटकलेली , तर कधी विजेच्या तारेवर किंवा खांबावर लटकलेली किंवा कधी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या त्या दिसतात.
आणि पतंग कटल्यानंतर, कधीकधी त्यांच्यासोबत मांजा सुद्धा येतो. कधीकधी, जेव्हा हा मांजा या पतंगांसह रस्त्यावर पडतो तेव्हा अनेकांना समस्यांना त्यामुळे तोंड द्यावे लागते.
यामुळे अनेक दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागते आणि कधीकधी पक्ष्यांनाही जखमा होतात . मुलं सुद्धा या दिवसांत कटलेल्या आणि आकाशात हेलकावे खाणार्या पतंगांच्या मागे खाली न बघता धांवताना दिसतात.
या दिवसांत रस्त्यांवर खूप वाहतूक असते, कधीकधी मुलं देखील पतंगांच्या मागे धावताना आणि रस्त्यावर येताना दिसतात, त्यामुळे वाहनचालकांना आणि त्या मुलांना सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
शहरी भागात या दिवसांत अनेक पतंग उडताना दिसतात आणि मुले त्या पतंगांच्या मागे धावताना दिसतात. जर आपण या दिवसांत रस्त्यांवर जरा सजगपणे वाहने चालवली तर सर्वानाच खूप मदत होऊ शकते कारण कधीकधी पतंगांचे धागे वाहनांवर येऊन लटकतात किंवा चालत्या वाहनांवर पतंग पडतात. अचानक त्या दिसल्याने मोठ्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे या दिवसांत काळजी घेणे आवश्यक आहे आणि मुलही जेव्हा या वर्दळीचा रस्त्यांवर धावताना दिसतात तेव्हा समस्या ह्या सर्वांचा अचानक वाढतात.







