महाराष्ट्र हे अस राज्य आहे जिथे मोठ्या प्रमाणात लोकं दररोज येतात इथे येऊन कोणी समोसे विकतो.
कोणी पाणी पुरी विकतो. कोणी कचोरी विकतो, कोणी ढोकला फापडा विकतो .
कोणी चाय विकतो, कोणी मच्छी विकतो तर कोणी सांबार वडा विकतो तर कोणी कोंबड्या विकतो.
कोणी येथे येऊन वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतात. कोणी चपला विकतात. कोणी कपड़े विकतात. कोणी सोने चांदी विकतात तर कोणी आणखी वेग वेगळे व्यवसाय करून बर्यापैकी सम्पति मिळवतात आणि इथेच स्थिरावतात .
मात्र आपल्याकडील कित्येक गावातील मुलांना किंवा शिकलेल्या तरुणांना काही या गोष्टी कराव्याशा वाटत नाही. त्याऐवजी त्यांना त्यांच्या दुकानात काम करायला आवडते. मग ते चपलेच् दुकान असो की मग चहाच दुकान असो किंवा मग कपड्याच दुकान असो.
आणि आपल्याकडे काही शिकलेल्या पोरांची कमतरता नाही, प्रत्येक गावात खोर्याने शिकलेली पोरं आपल्याला मिळून जातील आणि सर्व जण फक्त सरकारी नौकरी मिळवण्याचा स्पर्धेमध्ये लागलेले आहे हे बघायला मिळेल आणि त्यात काही वाईट नाही. सगळे जरी सरकारी नौकरी मिळविण्याचा मागे लागले तर, मग एवढ्या सगळ्यांना सरकारी नौकरया मिळायला तरी हव्या . मात्र तस काही होतांना दिसत नाही. ही जादू कधी होईल ती फक्त ते सरकारलाच माहीत म्हणजे जेव्हढे सरकारी नौकरी मिळविण्याच्या रांगेत लागले तेवढ्यांनाही रोजगार कसा मिळेल त्यामुळे काही नाही तर कित्येकांचा रोजगाराचा प्रश्ण तर सुटेल.
ठीक आहे मात्र सरकारी नौकरी नाही मिळाली तर मग दुसर काही. म्हणजे इकडचे तिकडचे लोकं येऊन जेव्हा आपल्या राज्यात कधी या गावात तर कधी कोणत्या गावात जाऊन रोजगार मिळवतात किंवा मग आपले छोटे मोठे दुकान टाकून आपला व्यवसाय करतात आणि मग हळूहळू इथेच स्थिरावतात मात्र ह्या गोष्टी आपल्या कडील लोकांना करायला कमीपणा वाटतो.
मात्र, कोणी बिहारयाने आपल्या हॉटेलात जर का चहा बनवला असेल आणि समोसे बनवले असेल तर तिकडे मात्र आमच्या लोकांच्या रांगा लागतात आणि त्या भय्याची प्रशंसा करता करता आम्ही थकत नाही.
मात्र, आमच्या गावातील लोकांना छोटासा अंड्याचा दुकान लावायला सांगा दोन पैशे त्यामुळे हातात येतील.
नाहीतर गावात कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायला सांगा तर ते नाक मुरडतील आणि म्हणतील नाही त्या पेक्षा आम्ही शहरात जाऊन रोजगार शोधू आणि एकदम आलिशान मध्ये आम्ही जगू.
मात्र आमची पोरं गावातून आल्यावर त्यांचे हाल शहरात काय होतात त्यांनाच माहिती.
जेवायला योग्य अन्न मिळत नाही. रहायला व्यस्थित खोल्या मिळत नाही आणि रोजगार मिळविण्यासाठी सुद्धा कित्येक ठिकाणी खेटरा झिजवाव्या लागतात. कारण आपल्याकडे दुकाने चालवणारे सुद्धा बाहेरचे अधिक असतात.
कुठे तरी दिसतो एखाद्या मराठी माणसाचा एखादा चहाचा दुकान नाहीतर मग एखादा पानठेला, तर कुठे दिसतो एखादा किराण्याच दुकान.
गावातील मूलं तिथेच पडून असलेले दिसतील नाहीतर ते पत्ते पीसन्यात आणि दारू पिण्यात प्रचंड बुडालेली दिसणार.
मुलांमध्ये आपल्याकडे या दिवसांत प्रतिभेची कमी नसते. शिक्षणात सुद्धा या दिवसांत मुलं माग नसतात.
म्हणजे प्राथमिक शिक्षण तरी त्यांच पूर्ण झालेले असते. प्रश्न असतो शिकून शिकून सुद्धा त्यांना का बेरोजगार रहाव लागतं. काय मग याला आपली शिक्षण पद्धती कारणीभूत आहे की याला आपल सरकार जबाबदार आहे?
कारण जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात शिकलेली मूलं बेरोजगार राहतात. जे शिकून सुद्धा रोजगार मिळवू शकत नाही किंवा व्यवसाय करू शकत नाही किंवा आपल्या पिढीजात व्यवसायात नवनवीन प्रयोग करून त्या व्यवसायांना पुढे नेऊ शकत नाही.
तर मुलांसमोर, मुलींसमोर या काळात आव्हाने अनेक असतात आणि यामध्ये शासनाच सहकार्य आणि त्यांची सुद्धा परिश्रम करण्याची सुद्धा तयारी असणे आवश्यकच असते आणि जर का रोजगार नाहीच मिळत असेल तर आपली छोटा मोठा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणे वाईट कुठे असते.







