येणार्या काळात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत आणि दुर्गम भागांत असलेल्या खेड्या पाड्यांत सुद्धा शिक्षणाची दारं उघडली तर तिथल्या कित्येक मुलांच्या जिवनात चांगले बदल हे बघायला मिळतील. अधिकाधिक प्रमाणात महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागातील तरुण वर्ग, मूलं मुली शिक्षण घेऊन जर का बाहेर पडले तर अनेक परिवारांना त्यामुळे आपल्या जिवनात चांगले बदल घडून येण्याची संधी मिळते .शासनाचा शाळांचा दर्जा मुख्यतः अधिक दर्जेदार आणि उत्तम असणे आज काळाची गरज आहे. त्याचबरोबर मुलांची पाउले शाळेकडे वळण्यासाठी सुद्धा आज मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे आवश्यक आहे.इकडे शिक्षणाचा टक्का वाढला मात्र रोजगार मिळत नाही, तर त्या मुलांसाठी अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे सुद्धा आवश्यक आहे. त्याच्याबरोबर राज्यातील आपली मूलं मुली फक्त रोजगाराच्याच मागे न जाता त्यांनी आपले छोटे मोठे व्यवसाय सुद्धा सुरू करण्याचा प्रयत्न करणे सुद्धा वाईट नाही. त्यामुळे सुद्धा खूपशे चांगले बदल त्यांना पुढे बघायला मिळू शकतात. जेणेकरुन राज्यात फक्त आणि फक्त रोजगार मागणार्यांचीच संख्या अधिक वाढतांना दिसणार नाही.
रोजगार मागणारे हात जर का प्रत्येक घरातून समोर येत असेल आणि रोजगार राज्यात उपलब्ध कमी होत असतिल तर, तर नक्कीच अनेको रोजगार मागणारे तरुण तरुणी हे रोजगारा विना असतिल. त्यामुळे, शिक्षण घेतल्यानंतर फक्त रोजगार मागणारीच आपली लोकं असतिल तर शासनाला सुद्धा सगळ्यांना रोजगार सर्वांसाठी उपलब्ध करणे हे अवघड कार्य असेल आणि तिथे सुद्धा प्रचंड प्रमाणात आज स्पर्धा बघायला मिळते त्यामुळे तरुणांची प्रचंड निराशा होतांना दिसते आणि त्यांच्या समस्यांमध्ये वाढ होताना सुद्धा बघायला मिळते.
त्यामुळे आज आम्ही जर शिक्षण घेत आहोत किंवा आम्हाला दुर्दैवाने शाळेत जाऊन शिकायची संधी नाही मिळाली तरी व्यावसायिक शिक्षण घेऊन आम्ही अनेक ठिकाणी रोजगार मिळवू शकतो आणि अनेक तरुण आम्हाला बघायला मिळतात की ज्यांच शिक्षण हे जेमतेम झालेल आहे मात्र त्यांनी एखाद क्षेत्र निवडले आणि तिथेच ते कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. तर त्यांच्यातील काहींनी आपले छोटे मोठे व्यवसाय सुद्धा सुरू केले; तर काही जिथे रोजगार मिळाला तिथेच टिकून राहिले. तर या प्रकारे त्यांनी आपल्या भाजी भाकरी आणि परिवाराचा गाडा चालवला. आजच्या घडीला महाराष्ट्रातील अनेक भागांत , शिकलेल्या तरुणांची संख्या कमी नाही, आणि त्यातही रोजगार मागणार्यांची संख्या दररोज वेगाने वाढत आहे. त्यामुळे स्पर्धेच वातावरण बाजारात आहे. आणि प्रत्येकाला रोजगार मिळणे शक्य नसते. कारण शासनाच्या एखाद्या विभागात कामाला लागतो म्हंटलं तर एका जागेसाठी अनेको जण रांगेत उभे आहेत अस दृश्य दिसत त्यामुळे अनेको वर्षे मुलांची स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यात खर्च होतात आणि हाती काही लागत नाही.त्याचबरोबर आपल्याला अनुभवायला मिळते की लोकसंख्या राज्यात किंवा शहरात वेगाने वाढत असल्यामुळे रोजगार, धंदे त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेको तरुणांना बेरोजगार रहाव लागतं.
तर खेड्यापाड्यात शिक्षण घेऊन किंवा पदव्या घेऊन सुद्धा आमची युवा पीढ़ी बेरोजगार राहत असेल तर, आता तशी परिस्थिती नाही. तरुणांनी वेग वेगळया व्यवसायात पडण्याचा प्रयत्न करणे वाईट नाही.शेतकर्यांची मूलं आणि कष्टकरयांची मूलं यांनी सुद्धा शिक्षण घेऊन फक्त सरकारी नौकरी किंवा मग शहराकडे पळ न काढता आपल्या शेती व्यवसायात लक्ष घालणे आज आवश्यक आहे. शेती व्यवसायात सुद्धा आज प्रचंड संधी आहेत. शेतकर्यांच्या परिवाराला आणि मुलांना कित्येकदा कर्जबाजारीपणामुळे आपली शेती विकावी लागते, त्यांची परिस्थिती अनेको गावांत आज कठीण आहे अस बघायला मिळत. ही परिस्थिती येणार्या काळात बदलणे आवश्यक आहे. स्थानिक शेतकर्यांच्या जमिनी त्यांच्या हातून जाऊ नये हे आज आवश्यक आहे. कारण अनेकांचे परिवार आणि गुजराण त्यावर होते.







