नुकताच राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींचा राज्यपाल जिष्णू देव वर्मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत कृषी विभागाकडून विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांनी या लोकांना गौरवण्यात आलं
या दरम्यान वर्ष २०२३ साठी ९१ आणि वर्ष २०२४ साठी ९८ अशा एकूण १८९ पुरस्कारार्थींना या वेळी सन्मानित करण्यात आले.
वर्ष २०२३ मधील पुरस्कारांमध्ये अमरावती जिल्ह्यातील श्री. निखील तेटू यांना कृषिभूषण (सेंद्रिय शेती), श्री. हेमंत निखाडे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, श्री. उमेश बगणे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट),
तर नागपूर जिल्ह्यातील श्री. पवन कटनकार यांना कृषिभूषण (सेंद्रिय शेती) आणि श्री. संतोष भगत यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) प्रदान करण्यात आला.
सन २०२४ मधील पुरस्कारांमध्ये अमरावती जिल्ह्यातील श्री. राहुल उभाळे यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, श्री. कृष्णा यशवंतराव लोखंडे यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, श्री. कुलदीप टोळे यांना युवा शेतकरी पुरस्कार, श्री. नवीनकुमार पेठे यांना उद्यानपंडित पुरस्कार, श्री. रामभाऊ ढोरे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) आणि सहायक कृषी अधिकारी कु. रुपाली वसंतराव ठाकरे यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच नागपूर जिल्ह्यातील श्री. निलकंठ कोढे यांना वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, श्री. भगवंता बनसिंगे यांना उद्यानपंडित पुरस्कार आणि श्री. नामदेव लांजेवार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) प्रदान करण्यात आला.
नागपूर व अमरावती जिल्ह्यांचा पालकमंत्री या नात्याने , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व पुरस्कारार्थींचे यावेळी अभिनंदन केले !
आपल्या कार्यातून महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र अधिक समृद्ध, आधुनिक आणि सक्षम होत राहो ह्या शुभेच्छा त्यांनी सर्व पुरुस्कार्थीना यावेळी दिल्या .






