लोकसभेतील वर्ष २०२६ च्या वित्तविधेयकावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या सभागृहात सरकारला काही महत्वाचे प्रश्न विचारले .
त्या म्हणाल्या कि जेव्हा देशातील काही राज्ये अडचणीत आहेत त्याचबरोबर आपली अर्थव्यवस्था संकटात आहे ,तर यातून आपण कश्या प्रकारे बाहेर पडू यावर आज सरकारकडून विचार होण्याची आज गरज आहे
त्याच बरोबर लोकसभेच्या सभागृहात वित्तविधयेकावर बोलताना त्या म्हणाल्या कि जेव्हा संपूर्ण देश आज गॅस सिलेंडर च्या समस्येने ग्रस्त आहे तेव्हा काही ठिकाणी असं निदर्शनास येत आहे कि काही ठिकाणी गॅस सिलेंडर हे निम्मे भरून दिले जात आहे आणि याप्रकारे फसवणूक करण्याचा प्रकार हा होत आहे .
त्यांनी पुढे हा सुद्धा मुद्द्दा मांडला कि आज देशातील छोटे मोठे उद्योग हे संकटात आहेत आणि ह्या उद्योगांना आज ऊर्जा देणे आवश्यक आहे .
त्याचबरोबर देशातील आज शेवटच्या घटकाला सुद्धा सुरक्षित करण्याची गरज आहे, तर हे मुद्दे खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या वित्तविधेयकावर बोलताना मांडले .
त्या पुढे म्हणाल्या कि शेअर मार्केट कोसळल्यामुळे लोकांचे ५ लाख कोटी बुडाले हा सर्वसामान्य लोकांचा पैसे होता .
युपीए चे सरकार होते तेव्हा रुपया कोसळताना विरोधी पक्षातील नेते सातत्याने टीका करत असायचे, त्यातले एक नेते म्हणायचे कि रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते आणि त्यांनी यावर त्यावेळच्या सरकारची खिल्ली सुद्धा उडवली होती; मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे.
अश्या प्रकारचे प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या कडून लॉसभेच्या सभागृहात वित्तविधयेकावर बोलताना सरकारला त्यांच्याकडून विचारण्यात आले .







