दिवाळीच्या दिवसांत भारतात पाळीव प्राण्यांची अवस्था वाईट असते. जिकडे तिकडे सकाळपासुन जेव्हा फटाके फुटत असतात
तेव्हा आजूबाजूला परिसरात असणार्या पाळीव प्राण्यांना फार त्रास सहन करावा लागतो.
सततच्या फटाक्यांचा आवाजामुळे गाई, म्हशी, कुत्रे, मांजर जे वर्षभरापासून घराच्या आजूबाजूला आणि सभोवताली दिसत असतात ते काही दिवाळीच्या दिवसांत दिसत नाहीत.
त्यांना सुद्धा फटाक्यांमुळे आणि फटाक्यांमुळे होणार्या प्रदूषणामुळे प्रचंड त्रास होतो.
अनेक पाळीव प्राण्यांना फटाक्यांमुळे ज़ख्मी सुद्धा होताना बघितल्या जाते.
त्यामुळे प्रत्यक गावातील पशु वैद्यकिय इस्पितळे या दिवसांत सुरू असणे आवश्यक असते, व तिथे योग्य औषधांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असणे आवश्यक असते.
त्याचबरोबर या इस्पितळांत पशुवैद्यकांची सुद्धा उपलब्धता असणे आवश्यक असते.
आणि जर का यांना फटाक्यांमुळे प्राण्यांना इजा झाली तर ते त्याच परस्थिति मध्ये रक्तबंबाळ होऊन इकडे तिकडे फिरत असतात.
त्यांचा त्रास, त्यांचा वेदना त्यांना माहिती असतात. आता यांना अश्या परिस्थित मध्ये पकडुन एखाद्या जवळच्या पशू वैद्यकिय इस्पितळात नेतो म्हंटलं तर ती इस्पितळे बंद असलेली आढळतात आणि अश्या प्राण्यांना तात्काळ उपचारासाठी नेण्यासाठी तिथे कोणतीही सोय सुविधा उपलब्ध नाही हे दृष्य अनुभवायला मिळत. त्यामुळे मग ह्या प्राण्यांचा काहीही दोष नसतांना लोकांच्या लापरवाही मुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करवा लागतो.
आपल्याकडे ह्या परिस्थिती मध्ये बदल होणे आवश्यक आहे. पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा योग्य इस्पितळे उपलब्ध असणे आणि त्या इस्पितळात पशु वैद्यांची उपलब्धता असणे. आणि अडचणीत आलेल्या पाळीव प्राण्यांना तात्काळ उपचारासाठी इस्पितळात आणण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध असणे आणि त्याच बरोबरीने हेल्पलाइन नंबर सुद्धा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
जेणेकरून या प्राण्यांना वेळेत इस्पितळात आणून त्यांच्यावर योग्य उपचार हा होऊ शकेल.






