देशात कुठेही, कोणत्याही भागात बघा, निवडणुकीपूर्वी लोकांच्या अपेक्षा काय असतात?
त्यांच्या भागातील रस्ते चांगले असावेत, गावातील बाजार चांगले असावेत, गावातील शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांची परिस्थिती चांगली असावी, गावात शौचालये बांधलेली असावीत,
भाज्यांचे भाव परवडणारे असावेत; इंधनाचे भाव सर्वसामान्यांना परवडणारे असावेत; स्वयंपाकाच्या गॅसचे भाव कमी असावेत. तर अश्या प्रकारचा अपेक्षा निवडणुकीपूर्वी सर्वसामान्य आणि गोरगरीब लोकांच्या असतात.
आणि ज्या लोकांना हि लोकं मोठ्या उत्साहाने मतदान करायला जातात तर त्यांचा कडून सुद्धा लोकांचा ह्याच अपेक्षा असतात ;
मात्र, निवडणुकीनंतर चित्र बघा काय दिसते; गावातील रस्त्यांची अवस्था वाईट असते , गावातील अनेक रस्त्यांच्या बाजूला असलेल्या खांबांवर दिवे नसतात; ना गावातील बाजारपेठांमध्ये योग्य त्या सुधारणा केल्या जात त्यामुळे मोठ्या प्रमाणात तेथील जनतेला दररोज प्रचंड मानसिक त्रास हा सहन करावा लागतो .
तिकडे शासनाकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये योग्य त्या सुधारणा केल्या जात नाही त्यामुळे तिथल्या मुलांना सुद्धा त्यामुळे त्रास सहन करावा लागतो आणि त्यांचा जीवनात सुद्धा काही चांगले बदल तिथे येताना दिसत नाही .
निवडणुका होऊन जातात, तिथे लोकांचा अपेक्षा काय असतात आणि काय ते बघतात , इंधनाचा किमती कमी होण्याऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसते त्याचबरोबर स्वयंपाकाचा गॅसचे भाव सुद्धा कमी होण्या ऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात ;
बाजारपेठांमध्ये भाज्यांच्या किमती वाढताना दिसतात मात्र तिकडे शेतकऱ्यांचा जीवनात फारसा काही बदल दिसत नाही कारण मोठं मोठे व्यापारी शेतकऱ्यांकडून भाज्या आणि फळे अतिशय कमी दरात विकत घेत असतात, ज्यामुळे शेतकऱ्यांचा हातात काही लागत नाही;
निवडणूक झाल्या कि रस्त्यांवर धावणाऱ्या शासनाचा वाहनांचे सुद्धा भाडे वाढते आणि त्याचा फटका हा सामान्य आणि गोरगरीब जनतेला बसतो मात्र यांचा अपेक्षा काय असतात सरकार कडून आणि याना मिळत काय; महागाई !
त्यामुळे निवडणुकीपूर्वी लोकांच्या अपेक्षा बऱ्याच असतात, मात्र निवडणुकीनंतर सरकार पद्धतशीर लोकांना चुना लावून देतात . अशी परिस्थिती असते या दिवसांत .







