दरवर्षी पर्यावरण दिन साजरा करणे सोपे आहे, पण जेव्हा आपण आपल्या सभोवताली बघतो तेव्हा आपल्याला आपल्या पर्यावरणाची परिस्थिती काय आहे हे लक्षात येते.
मोठ्या प्रमाणात लोकं या दिवसांत त्रासलेले दिसतात. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये परिस्थिती हि कठीण असते
लोकं शिक्षण घेत आहेत मात्र अस वाटते की आपल शिक्षण हे आपल्याला आंधळ करत आहे.
कारण , आपण आपल्याला आणि लोकांना दररोज भेडसावणाऱ्या समस्या जरी दिसत असतील मात्र दिसत असताना सुद्धा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ह्या दिवसांत अतिशय उदासीन असल्याचा चित्र असते.
त्याच बरोबर , या दिवसांत देशातील अनेक शहरांना वायू प्रदूषणाच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे आणि प्रदूषित व विषारी हवेत दररोज लोक जगत आहे अश्या प्रकारचं चित्र आपल्याला आपल्या समाजात बघायला मिळत आणि याकडे दुर्लक्ष होताना दिसते आणि या प्रश्नांवर काम होताना सुद्धा दिसत नाही .मोठ्या प्रमाणात भारत देशामध्ये राहणारे लोकं या समस्येने त्रस्त आहे हे चित्र आहे .
दुसरीकडे, आपली मर्यादित असलेली जलसंपदा अधिकाधिक प्रदूषित होत आहे, ज्यामुळे ती मानव आणि प्राणी दोघांसाठीही निरुपयोगी ठरत आहे.
मोठ्या प्रमाणात मातीच होणार प्रदूषण आणि जमिनीवर मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या प्लास्टिकमुळेही लोकांसाठी अनेक समस्या निर्माण होतात.
पर्यावरणाचा असमतोल या दिवसांत आपल्याला अनुभवायला मिळतो , पावसाळ्याचा मोसमात , प्रचंड उकाड्याचे दिवस आपल्याला अनुभवायला मिळतात तर कित्येक दिवस काही काही भागांत पाऊसच होत नाही; त्यामुळे लोकांचा समस्या अधिक वाढतात .
त्याचबरोबर हिवाळ्याचा मोसमात काही काही वेळा बराच पाऊस होतोय असं लोकांना अनुभवायला मिळत आणि उन्हाळ्याचा मौसमात सुद्धा लोकांना कधीकधी बराच पाऊस होतोय अश्या प्रकारचं चित्र अनुभवायला मिळत ;
त्याचसोबत तापमान सामान्यांपेक्षा अधिक वाढल्यामुळे लोकांच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतानाच चित्र अनुभवायला मिळत ;
तर अश्या प्रकारचं असंतुलन आपण या दिवसांत वातावरणात अनुभवत असतो . त्याचबरोबर आपल्या जलस्रोतांना प्रदूषणापासून वाचवणे ही जितकी सरकारची जबाबदारी आहे, तितकीच आपलीही आहे हे आज आपल्याला समजणे आवश्यक आहे .
आपल्याकडे पाण्याचे स्रोत आहेत, पण ते जर खूप प्रदूषित असेल तर ते कोणाच्याही कामात येणार नाहीत . त्याचबरोबर, जर जमीन हि प्रचंड प्रमाणात प्रदूषित होत राहिली तर त्यामुळे आपल्या समस्या आणखी वाढतील. ज्या प्रकारे डोक्यावर केस नसतील आणि जमिनीवर झाडे नसतील, तर दोन्ही ओसाड दिसतात आणि त्यामुळे समस्यांमध्ये वाढ होते. त्यामुळे आपण जर निसर्गाचा समतोल राखला, तर आपल्याला हवा चांगली मिळेल आणि ती शुद्ध राहील आणि आपल्याला शुद्ध पाणी मिळेल आणि ते पाणी लोकांना मुबलक प्रमाणात उपलब्ध सुद्धा होईल ; जर झाडे आणि वनस्पती टिकून राहिल्या, तर लोकांना विविध प्रकारची फळे खायला मिळतील; लोकांना विविध प्रकारची फुले पाहायला मिळतील आणि आपल्या गावांमध्ये विविध प्रकारचे पक्षी दिसतील. छोटे मोठे प्राणी दिसतील. आणि जर का निसर्गाचा समतोल बिघडला, तर प्रत्येकाचे जीवन हे कठीण असेल.
आणि जर जमिनीवर पाणी नसेल आणि जर का असले आणि ते जर का मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेलं असेल तर ते कोणाचा उपयोगात येणार नाही; जमिनीवर झाडे नसतील, तर हवे मध्ये प्रदूषण अधिक असेल आणि पुढे वाळवंटासारखी परिस्थिती तिथे निर्माण होईल; परंतु ही परिस्थिती सुधारणे आपल्या हातात आहे. हे समजणे आज आवश्यक आहे







