स्थलांतर हा महाराष्ट्रासाठी मोठा मुद्दा आहे. सातत्याने बाकीचे राज्ये जेव्हा त्यांचा राज्यातील लोकांसाठी आणि तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यात आणि त्यांच्या साठी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जेव्हा वेगळे पर्याय शोधू शकत नाही अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते; त्यामुळे मोठ्या प्रमाणात दर वर्षी वेगवेगळया राज्यातून त्या युवकांच आणि लोकांच रोजगारासाठी आणि व्यवसायासाठी महाराष्ट्रा सारख्या राज्यामध्ये स्थलांतर होतांना निदर्शनास येत.
मोठ्या प्रमाणात लोकांचे लोंढे इकडे येत असल्यामुळे सहाजिकच अनेकांना आणि स्थानिक लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतांना अनुभवयास येत .
स्थानिक लोकांना जिथे राज्यात रोजगार मिळायला हवा ते रोजगार स्थलांतरीत लोकांना मिळतात आणि या प्रकारचं चित्र अनुभवायला मिळत.
जे स्थानिक लोकं आपल्या राज्यात छोटे मोठे व्यवसाय सुरू करतात. त्यांच्या व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळणे अधिक महत्वाच असत मात्र तिथे सुद्धा बाहेरून मोठ्या प्रमाणात आलेल्या व्यवसायामुळे इथल्या स्थानिक व्यवसायांवर नियमित परिणाम हा होतांना दिसतो. इथल्या बाजारपेठांत हळूहळू स्थानिक दुकाने आणि व्यवसाय कमी आणि बाहेरून आलेल्या लोकांचे दुकाने आणि व्यवसाय फोफावत आहेत हे चित्र दिसत .
त्यामुळे अनेको स्थानिक लोकांचे व्यवसाय हे बुडण्याचा आणि बंद होण्याचा मार्गावर दिसतात आणि याला स्थानिक प्रशासन आणि कुचकामी राजकिय इच्छा शक्ति ही कारणीभूत असते. जमिनीच क्षेत्रफळ कमी आणि त्या जमिनीवर लोकांची वाढती लोकसंख्या त्या क्षेत्रातील लोकांच्या जिवनात अनेक समस्या ही निर्माण करते.
वाढत्या स्थलांतरावर नियंत्रण जर का आपन मिळवू शकलो नाही तर त्या त्या क्षेत्रातील लोकसंख्या वाढण्यास खत पाणी मिळते आणि त्याचबरोबर स्थानिक लोकांचे व्यवसाय आणि रोजगार हे प्रभावित होताना आणि बुडताना दिसतात आणि त्या जागी मोठ्या प्रमाणात बाहेरील लोकांचे व्यवसाय हे फोफवतांना आपल्याला बघायला मिळते. आणि याला आपलं प्रशासन आणि कुचकामी राजकीय कारभार हा कारणीभूत असतो .







