पूर्वी फोन वैगरे जेव्हा बाजारात यायचे होते. जेव्हा लोकांकडे अस क्षणात कुठेही कोणाशीही जुडायची माध्यमे नव्हती. तेव्हा लोकं एकमेकांना भेटण्यासाठी खास वेळ काढून किंवा सुट्ट्या काढून आपल्या मित्रांकडे किंवा आपल्या नातेवाईकांकडे जात असत.
काही दिवस त्यांचा सोबत घालवत असत. मनसोक्त एकमेकांकडुन गोष्टींची, अनुभवांची आणि आपापल्या गावा बद्दलची ते त्या प्रकारे माहिती घेत असत आणि आणखी अनेक गोष्टी त्यांना ऐकायला मिळत.
एकमेकांमध्ये जर का काही मतभेद निर्माण झाले असेल तर ते सुद्धा त्या भेटीमुळे किंवा तो वेळ जेव्हा आपल्या नातलगांसोबत किंवा मित्र परिवारा सोबत ते घालवत तर मतभेद सुद्धा दूर करण्यास त्यामुळे मदत होत असत. त्यामुळे कोणतेही नाते अधिक काळ तेव्हा टिकून रहायची.
पोस्टाने पत्र वगैरे तेव्हा यायची तर अनेक लोकं त्या पत्रांची आतुरतेने वाट बघत असायचे. अनेकांची ह्या येणार्या पत्रांसाठी घालमेल सुरू असायची.
त्यामुळे एकमेकांबद्दल त्यांना जाणून घेण्यास मदत व्हायची.
मात्र वेगाने काळ बदलला. तंत्रज्ञानाने खूप काही बदल घडवून आणले. हातात लोकांच्या फोन आले. कॉम्युपुटर्स आले. वेगवान वाहणे आली, रेल गाड्या आल्या, विमाने आलीत जी साधने मुख्यतः लोकांच जीवन सुखकर आणि सोप बनविण्यासाठी आली.
मात्र समाजाची वेगाने प्रगती होत असतांना लोकं मात्र जवळजवळ बसले असतांना दूर होत गेले. हातात फोन असून सुद्धा, किंवा लॅपटॉप असून सुद्धा, किंवा लाखो करोडो रुपये असून सुद्धा कित्येक लोकं एकमेकांपासून दूर जाताना दिसतात.
संवादाची साधणे अगदी हातात असून सुद्धा अनेको दिवस कींवा महीने कींवा वर्षे अनेकांमध्ये संवाद नसतो.
एका घरात राहत असले तरी अनेक जण आज एकमेकांपासून दुरावलेले दिसतात.
मात्र, ह्या आधुनिक साधनांना जरा दूर सारल आणि ज्या आपल्या मित्रांना किंवा नातलगांना आपल्याला भेटावसं वाटल किंवा एकमेकांमधले गैर समज दूर कारावस वाटलं तर,सहज एकमेकांची भेट घेणे, एकमेकांसोबत वेळ घालवणे आणि एकमेकांची बाजू ऐकून घेणे.
जिथे कुठे आपन चूक आहोत तेथे प्रामाणिकपणे आपली चूक मान्य करणे आणि समोर जाने यामुळे आपले मैत्रीचे नाते किंवा आपले नाते अधिक काळ टिकू शकतात आणि मजबूत होऊ शकतात.
संवाद नसेल तर फक्त आणि फक्त गैरसमज वाढवतो, दुरावा वाढतो, कटुता वाढते आणि कितीही चांगले नाते असले तरी ते दुरावतात..







