रेल्वे गाड्यांची अवस्था आपल्याकडे बरीच वाईट असते आणि वेगाच्या बाबतीत त्या चीन, जपान आणि युरोपमधील रेल्वे गाड्यांशी स्पर्धा करू शकत नाही. त्याचबरोबर ह्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे दररोज हाल होतांना दिसतात.
रेल्वे स्थानकांवर असलेली प्रचंड गर्दी आणि त्याचबरोबर रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी असलेल्या लोकांची गर्दी रेल्वे विभागासाठी आणि शासनासाठी सुद्धा मोठी आव्हानात्मक बाब असते. कशाप्रकारे प्रवाशांचे होणारे दररोज चे हाल कमी करता येईल त्याचबरोबर कश्या प्रकारे आणखी चांगल्या सोयीसुविधा पुरवाव्या.
कशा प्रकारे रेल्वे मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे होणारे हाल कमी करता येईल आणि आणखी वेगवान रेल्वे आपल्याकडे तयार होतील याचा प्रयत्न होणे या काळात आवश्यक आहे.
मुंबई मध्ये धावणार्या लोकल ट्रेन आणि त्या मार्गाने जाणार्या रेल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी लोकांना बघायला मिळते.
लोकांना रेल गाड्यांमधे तिकीट काढून सुद्धा तिथे बकऱ्या मेंढरासारख प्रवास करावा लागतो. आणि तेथील रेल्वे स्थानकांवर सुद्धा प्रचंड गर्दी ही अनुभवायला मिळते.
आणि त्यातही रेल्वे गाड्यांची अवस्था आपल्याकडील बघितल तर त्या अतिषय जुन्या झालेल्या आणि भंगारात टाकण्यासारखी त्यांची परिस्थिती आहे हे सर्वांना बघायला मिळते.
तरी सुद्धा अनेक प्रवाशी दररोज कसेबसे त्या रेल गाड्यांत प्रवास करत असतात. हे आपल्याला अनुभवायला मिळते.
त्यामुळे या परिसथिती मध्ये बदल होणे आवश्यक आहे असं वाटत . म्हणजे एवढया मोठ्या संख्यने देशातील असंख्य लोक वर्षभरही रेल्वेने प्रवास करतात मात्र त्यांचा सेवेसाठी काही चांगल्या रेल गाड्या येणे आवश्यक आहे आणि उपलब्ध असलेल्या रेल गाड्यांच्या डब्ब्यांमध्ये योग्य ते आवश्यक बदल होणे आवश्यक असते .
त्या रेल गाड्यांमध्ये प्रवास करणार्या प्रवाश्यांना योग्य त्या सुविधा तिथे उपलब्ध होणे आणि असणे आवश्यक असते.
अनेकांचे त्या रेल गाड्यांमध्ये प्रचंड हाल होतांना दिसतात फक्त काही लोकं अधिक पैसा मोजून मिळविलेल्या डब्यां मध्ये प्रवास करताना दिसतात आणि बाकीचे अनेक लोक दररोज त्या रेल गाड्यांचा डब्ब्यात धक्के खातच आणि गुराढोरांसारखेच प्रवास करत असतात . त्यामुळे या परिस्थिती मध्ये बदल होणे आश्यक आहे असं वाटत
त्याचबरोबर रेल्वे स्थानके सुद्धा अधिक आधुनिक, सुसज्ज आणि प्रवाशांसाठी योग्य त्या सोयी सुविधा असलेले निर्माण होणे आज या काळात आवश्यक आहे.
चीन आणि जपान कडे या दिवसांत या दिवसांत 350 ते 400 किमी प्रति तास या वेगाने धावणार्या गाड्या आहेत आणि आपल्याकडे सर्वाधिक वेग हा आपल्याला रेल गाड्यांचा जेमतेम 150 ते 175 किमी प्रती तास या वेगाने धावणाऱ्या गाड्या असतात आणि त्या गाड्यांची अवस्था फार चांगली नसते.
सोयी सुविधांच्या बाबतीत आपल्या रेल गाड्या दररोज प्रवास करणार्या असंख्य प्रवाशांची निराशा करणार्या असतात. हे बघायला मिळते अनेक रेलगाड्यानी प्रवास करणारे लोक पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मुद्दाम प्रवास करत असतात.
तर या परिस्थितीमध्ये या आता बदल होणे आवश्यक आहे अस वाटत. रेल्वे स्थानकावर योग्य त्या सुविधा असणे. त्याचबरोबर, प्रवाशांचे हाल हे रेल्वे स्थानकावर होऊ नये या साठी योग्य ते पावले उचलणे सुद्धा आवश्यक आहे अस वाटत.






