कोणाचा फायदा होवो ना होवो मात्र दलालांचा फायदा ठरलेला असतो. कुठून कुठून त्यांना फायदा होईल हे त्यांच त्यांना माहिती असत. शेतकर्यांसाठी संप केला असेल तर त्यातून त्यांचा फायदा असतो. बाकी शेतकर्यांना त्यातून काही मिळो ना मिळो मात्र यांची कमाई ठरलेली असते.
कामगारांसाठी संप केला असेल किंवा मोर्चा काढला असेल तर तिकडे सुद्धा कमिशन लागलेलच असते.
विद्यार्थ्यांचा नावाने संप केलेला असेल तर तिकडे सुद्धा, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटो अथवा न सुटो मात्र यांची कमाई ठरलेली असते.
संपामध्ये, मोर्चामध्ये यांना मात्र जनावरांच्या कळपा सारख आणून बसविल्या जात. यांना अपेक्षा आपले प्रश्न सुटावे आपल्या समस्या कमी व्हाव्यात अश्या असतात. मात्र यांचे प्रश सुटत नाही, पुढच्या वेळेस परत ते सारख्या प्रश्नांना घेऊन संपाला बसलेले दिसतात किंवा मोर्चा काढतांना दिसतात. यांचा एवजी त्यांचे प्रश्न सुटलेले असतात.
हा एक चांगला मार्ग आहे भोळ्या भाबड्या आणि समस्यांनी ग्रस्त असलेल्या जनतेला, कामगारांना आणि विद्यार्थ्यांना गोलगोल फिरवून आणि नाचवून आणि हातात काहीही न देण्याचा.
आणि अश्या प्रकारची पद्धत चालत असल्यामुळे यांचे प्रश्न आणि समस्या ह्या सुटतांना दिसत नाही वर्षोनुवर्षे.
त्या एवजी तेच प्रश्न दरवर्षी उभे होतांना दिसतात आणि यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात इतर लोक आपला राजकिय फायदा करून घेण्यासाठी करतांना दिसतात त्यातून फक्त आपला फायदा करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
त्यामुळे ही बाब आज समजणे आवश्यक आहे जागरूक होण्याची गरज आहे की जेव्हा मेंढरासारख आणून बसविल्या जात आहे तर त्यात खरच त्या समस्या सुटत आहेत का की त्या माध्यमातुन अनेक जण आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.







