गणेश चतुर्थी निमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीचा शुभेच्छा दिल्या .
गणेशोत्सवाच्या माध्यमातून जगभरात महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा सिद्ध होत असून, समाजसुधारक आणि थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा विचार आणि मराठी माणसाची ताकद संपूर्ण जगाला दिसत आहे.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार, गुंतवणूक आणि विकासाची नवी शिखरे गाठत असताना, गणरायाच्या आशीर्वादाने आपली संस्कृती जपत महाराष्ट्राला जगातील अव्वल राज्य बनवण्यासाठी एकत्रितपणे काम करूया अश्या प्रकारचा भावना त्यांनी समाजमाध्यमवर जनतेला गणेश चतुर्थीनिमित संदेश देताना मांडल्या .







