राज्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते, या भावनेतून केंद्र आणि राज्यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोव्यामध्ये ;
नुकताच पार पडलेल्या पश्चिम विभागीय परिषदे मध्ये व्यक्त केलं. हि परिषद केंद्रीय गृह मंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचा अध्यक्षतेमध्ये गोव्यामध्ये पार पडली .
परस्परातील समन्वयाचे हे एक अतिशय उत्तम व्यासपीठ आहे या माध्यमातून राज्याराज्यातील प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढला जातो.
विकासाच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करत ‘टीम इंडिया’ची भावना अधिक बळकट करण्यास अशा बैठकींचा निश्चितच फायदा होत असल्याचं उपमुख्यंमत्री एकनाथ शिंदे हे या दरम्यान म्हणाले .
या परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा उपस्थिती होती.







