तीव्र उन्हाळ्याचे चटके सहन केल्यानंतर लोकं पावसाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. फक्त लोकच नाही , तर पक्षी , प्राणी आणि शेतकऱ्यांना सुद्धा पावसाचा येण्याची आशा लागलेली असते, कडक उन्हाचे चटके बसल्यानंतर फुल झाडांना सुद्धा पाऊस पडण्याची पावसाचा मोसमात आशा हि असते .
पण या दिवसांत आपल्याला पर्यावरणाचं संतुलन हे बिघडलेलं आहे असं बघायला मिळते . त्यामुळे पाऊस सुद्धा ह्या सगळ्यांची परीक्षा बघत असतो .
आणि या मोसमात पाऊस जर का वेळेवर आला नाही तर असंख्य शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर चिंतेचे भाव बघायला मिळतात , त्यांचा डोळ्यांत अश्रू बघायला मिळतात.
आणि अश्यातच जर का पावसाला सुदैवानं सुरवात झाली तर तो अनेकांचा जीवनात आशा आणि हास्य सुद्धा घेऊन येतो .
चांगला पाऊस येण्यामुळे ज्या नद्या, नाले , तलाव कोरडे पडले होते तिथे परत पावसाचं पाणी वाहायला लागत आणि यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळतो . शेतकऱ्यांचा पेरणीचा कामाला त्यानंतर हळूहळू सुरवात होते .
उन्हाळ्यामुळे मरगळलेल्या फुलझाडांना परत तजेलदारपणा येतो तेसुद्धा जरा आता टवटवीत दिसायला लागतात.
उन्हाळ्यामध्ये पाण्याचा थेंब थेंबासाठी भटकंती करण्याऱ्या अनेक खेड्या पाड्यातील आणि दुष्काळी भागातील लोकांची पाण्यासाठी भटकंती काही काळासाठी का असेना थांबते .
अनेक त्रासलेल्या , थकलेल्या आणि केविलवाण्या चेहऱ्यांवर परत हास्य तरळत .
तिकडे पावसाळ्यात पाऊसाचा सरींचा आगमनाने लहान मोठ्यांचा हातात रेनकोट आणि छत्र्या दिसायला लागतात, आणि मुलं आणि तरुणाई सुद्धा पावसाळ्याचा आनंद घेताना आपल्याला बघायला मिळत.
पावसाळ्यात पावसाचा सरींचा आगमनाने, .ज्या बेडकांचा कुठेही थांगपत्ता नसतो ते बेडकसुद्धा आता दिसायला लागतात. इकडे तिकडे उड्या मारू लागतात;
तलावांत किंवा छोट्या छोट्या डबक्यांत बेडकांचा खेळ परत सुरु होतो आणि मासोळ्या सुद्धा आपल्याला यावेळी पाण्यात उड्या मारताना बघायला मिळतात .
रात्रीचा वेळी साचलेल्या डबक्यांत एकत्रित पणे मिळून बेडकांचा ओरडण्याचं सुमधुर संगीत कानावर पडायला लागत . जे आपल्याला बाकी कोणत्या ऋतू मध्ये अनुभवायला मिळत नाही . तर अश्या प्रकारचं सुंदर चित्र आपल्याला पावसाळ्याचा सुरवातीला बघायला मिळत .
परंतु दुसऱ्याबाजूला कधीकधी पावसाळ्याचा दिवसांत, नद्या नाल्याना पूर आल्यामुळे आणि नदी, नाले , तलाव ओसंडून जेव्हा वाहत असतात तेव्हा
अनेक रस्त्यांवरून आणि पुलांवरून पाणी अत्यंत अधिक वाहायला लागत; ह्या प्रकारची असाधारण परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते .
अशा परिस्थितीत, जर नदीची पाण्याची पातळी वाढलेली असेल, आणि पुलं हे अत्यंत जुनी झालेली असेल गांजलेली असेल , आणि नदी नाले ओसंडून वाहत असेल जर पाऊस सतत पडत असेल ,
तर अशा परिस्थितीत तरुणांनी, युवकांनी आणि लोकांनी सुद्धा अश्या क्षेत्रापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आणि सावधानी घेतली .तर आपण पावसाळ्यात उदभवणाऱ्या समस्यांपासून दूर राहू शकतो .
असं , असलं तरी पावसाळा हा ऋतू सर्वांना हवाहवासा असतो , सर्वांना पावसाचा येण्याची अपेक्षा लागलेली असते , अनेकांचा जीवनात पावसाळा आशा , अपेक्षा आणि परत उत्साह घेऊन येतो . हे तेवढच खर






