५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये भारतीय संघाने ५ सुवर्णपदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे .
कोलंबियामधील बुकारामांगा येथे जुलै ५ ते १२ जुलै दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली होती .
भारताने चीन, रशिया आणि दक्षिण कोरियासोबत यामध्ये संयुक्तपणे जगात प्रथम क्रमांक पटकावला.
सुर्वणपदक विजेत्या ५ विद्यार्थ्यांमध्ये महाराष्टाच्या दोन विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश त्यामध्ये आहे .
यंदाच्या ऑलिम्पियाडमध्ये ८७ देशांतील ३८१ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धे मध्ये सुर्वण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचं भारताचे संरक्षण मंत्री तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं
आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमधील भारताचा हा २७ वा सहभाग असून, त्याद्वारे आपली उत्कृष्टतेची परंपरा अधिकच बळकट होत आहे.
गेल्या दशकापासून, भारताचे प्रत्येक पथक पदकासह मायदेशी परतले आहे अशी भावना भारताचे संरक्षण मंत्री श्री . राजनाथ सिंग यांनी व्यक्त केली .
जागतिक दर्जाच्या वैज्ञानिक गुणवत्तेला वाव देण्याबाबतची आपल्या देशाची निरंतर कटिबद्धता यातून दिसून येते असं सुद्धा ते पुढे म्हणाले .







