महाराष्ट्रा मध्ये जा प्रकारे प्रादेशिक पक्षांची अवस्था झाली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका असो किंवा मग विधानसभेचे किंवा लोकसभेचे परीणाम ज्या प्रकारे आले, त्यावरून लोकांना कळत , की कशा प्रकारे राज्यातील प्रादेशिक पक्षांचा कचरा करणे राष्ट्रीय पक्षांकडून गेल्या काही काळापासून सुरू आहे;
आणि यामध्ये बाहेरचेच नाही तर , इथली सुद्धा लोकं समोर आहेत असं सुद्धा आपल्याला बघायला मिळते . म्हणजे ,ज्यांना वाटत की आमची प्रगती व्हावी आणि बाकीचे पक्ष बुडले काय आणि चालले काय आम्हाला त्याच्याशी काहीएक देण घेणे नाही.
या दिवसांत हे सुद्धा बघायला मिळत कि कुठले कार्यकर्ते कुठे चालले आणि कुठे स्वाभिमान आणि तत्व वगैरे गहाण ठेवले हे सुद्धा यातून दिसून पडते ; दलाली जिकडून मिळेल तिकडे या दिवसांत दलालांच जाने आणि येणे सुरू असते; हे चित्र आता सामान्य झालं आहे . यांना ना राज्याचा प्रगती शी देने घेणे आहे ;ना यांना राज्याचा परिस्थितीशी देने घेणे आणि ना समाजाचा प्रगती शी काही देणे घेणे आहे असं त्यावरून समजत.
कित्येकदा तिकडे आपल्याच लोकांना, लोकं जातीचा नावावर खाली ओढत आहे हे चित्र बघायला मिळत ; ज्यामुळे बाहेरचा लोकांना त्याचा सहज आणि अप्रत्यक्षपणे फायदा होताना तिथे बघायला मिळतो. त्यामुळे अनेक क्षेत्रात स्थानिक लोकांची पीछेहाट होताना दिसते ,
मग ते रोजगार असो , कि व्यवसाय असोत कि मग शिक्षणाचं क्षेत्र असो किंवा मग राजकीय क्षेत्र सुद्धा असो त्यामध्ये बरीच पिछाडी होताना प्रत्यक्षात दिसते . कागदावर आकडे जरी काहीही दिसत असले तरी .
बाहेरचे लोकं येऊन मग स्थानिक लोकांमधील मतभेदाचा नियमितपणे फायदा घेत आहे असं दृश्य हे बघायला मिळत .स्थानिक लोकांमधील मतभेदाचा , भेदभावाचा अप्रत्यक्षपणे फायदा या लोकांना होताना दिसतो आणि पूर्वी सुद्धा या प्रकारचा फायदा अप्रत्यक्षपणे उचलल्या जात होता त्यामुळे सुद्धा लोकांची आणि स्थानिक जनतेची आर्थिक परिस्थिती , सामाजिक परिस्थिती हि ढासळलेली दिसायची आणि आता सुद्धा काही बरी परिस्थिती आहे असं नाही .







