आमदार श्री .सुधीर मुनगंटीवार यांनी , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची नुकताच मुंबईतील वर्षां या निवास्थानी भेट घेऊन. त्यांचा मतदारसंघातील जनतेला भेडसावणारे प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडले .
यावेळी शेतकऱ्यांचा हिताचा प्रश्नांसोबतच , शेतकरी पीक विमा योजनेतील विम्याचा हफ्त्यांचा मुद्दा त्यांचा कडून मांडण्यात आला .
त्याचबरोबर त्यांनी यवतमाळ येथील शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या प्रश्नांबद्दल मुख्यमंत्र्यांकडे विचारणा सुद्धा केली , यादरम्यान त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी निश्चित करण्यात आलेला पीकविमा हप्ता इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे;
ही बाब मुख्यमंत्र्यांना निदर्शनास त्यांनी आणून दिली त्याचबरोबर पीकविम्याचे दर समतोल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी या दरम्यान त्यांचा कडून करण्यात आली .
तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २४ तास कृषी वीजपुरवठा मिळावा आणि पीकविमा योजनेचा लाभ, नोंदणीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ मिळावी अश्या प्रकारचा मागण्या त्यांच्याकडून यावेळी करण्यात आल्या.
.







