आदिवासी, दलित आणि मागासलेल्या म्हणजे obc (other backward classes) st (schedule tribes) sc (schedule caste ) तर या कॅटेगरी मध्ये लोकांची परिस्थिती काही फार सुधारली आहे अस नाही.
तर या समाजातील लोकांची परिस्थिती काय आहे. शिक्षणामुळे, आर्थिक कारणामुळे देशातील लोकं आता सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात मागे पडलेले आहेत आणि मागासलेले आहेत. तर यांची परिस्थिती अनेको वर्षापासुन अश्याच प्रकारची राहण्यासाठी त्या त्या काळातील सामाजिक परिस्थिति जबाबदार होती.
आणि आता सुद्धा जेव्हा अंशी कोटी लोकांना जेव्हा मोफत अन्न वाटाव लागत. तर आता सुद्धा यांची परिस्थिति ही कठिन आणि गंभीर आहे. शिक्षणामुळे मोठ्या प्रमाणात हे लोकं मागे पडलेले आहेत. त्याचबरोबर, आर्थिक परिस्थितीने यांना अनेको वर्षे समाजात पंगू करून ठेवण्यात आल.
आणि त्यातही अश्या प्रकारची मानसिकता असलेले लोकं आणि राजकारणी आता सुद्धा आहेत ज्यांना आता सुद्धा वाटते की ह्या लोकांची प्रगती व्हावी नाही म्हणजे जेव्हा देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे याचा अर्थ साठ कोटी लोकं अशे आहेत ज्यांचा खाण्यापिण्या, राहण्याचे, रोजगाराचे प्रश्ण हे कदाचित सुटले आहेत बाकी एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेला आज सुद्धा अन्न पुरवठा करावा लागतोय.
यावरून कळते काय परिस्थिती आहे. त्यातच मग या लोकांना मुद्दामून या ना त्या मार्गाने टार्गेट केल्या जात, त्रास दिला जातो आणि राजकिय मंडळींची या मध्ये भूमिका मोठी असते. म्हणजे यांना अस वाटत की;
तुमचे रोजगाराचे प्रश्ण तसेच राहावे विकासाचे प्रश्ण तसेच राहावे, तुमच्या मुलांनी शिकू नये, तुमचा मुलांनी जे अनेको वर्षे अन्याय, अत्याचार सहन केला तेच सहन करत रहावा आणि त्यामुळे या लोकांना मेंढरासारख किराया ने विकत आणून त्यांना त्यांच्या विकासाचा गोष्टी, त्यांचा रोजगाराचा मुद्द्याबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलण्याबद्दल किंवा त्यामध्ये बदल कश्या प्रकारे आणता येईल या बद्दल बोलण्याऐवजी. कोणत्या जातीची किती लोक आहे आणि कोणत्या जातीचे किती लोक नाहीत आणि यांच्यामध्ये विष पसरवण्याचा काम मुद्दाम केल्या जात त्यामुळे वर्षोनुवर्षे एकाच समजात लोकं रहायचे जे विभागल्या गेले; त्यांच्यामध्ये परत कशा प्रकार मतभेद निर्माण करायचा आणि आपला मतलब साध्य करायचा हा त्यांचा उद्देश असतो.
आणि या मुळे या लोकांच्या परिस्थीती मध्ये मात्र काही बदल येत नाही हे सत्य आहे.







