कित्येक गावा खेड्यात या दिवसांत बाजारांची परिस्थिती बरी नसते. आम्हाला बघायला मिळते की भाजी विक्रेते कित्येकदा घाणीत आणि चिखलात आणि जिथे प्रचंड कचरा साचलेला आहे अश्या ठिकाणी बसलेले आहेत आणि तिथे बसुन ते ग्राहकांना भाजी विकत आहेत.
तिथून खूप दुर्गंधी येत आहे आणि त्याच ठिकाणी लोकं, स्त्रिया येऊन भाजी खरेदी करत आहेत. तिथेच मांस विक्री वगैरे होत आहे. मात्र जिथे हे सगळे भाजी वाले,
आपआपला भाजीपाला घेऊन बसलेले आहेत ती जागा अतिशय अव्यवस्थित, घाणेरडी आहे आणि अनेको वर्षां पासुन तिथे त्या गावात किंवा तालुक्यात किंवा जिल्ह्यात योग्य अशे भाजी बाजार लोकांना आणि भाजी विक्रेत्यांना तयार करून देण्यात आलेले नाहीत.
तिथे त्यांची दररोज फजिती होत आहे आणि लोकांना सुद्धा जिथे भाजी विकल्या जात आहे, मांस, मासोळी विकल्या जात आहे तिथे अनेक समस्याना सामोरे जाव लागत आहे.
भाजी बाजार योग्य प्रकारे तयार केल्या गेले नसल्यामुळे व भाजी विक्रेत्यांना भाजी विकण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे हे भाजी विक्रेते आम्हाला अगदी रस्त्याचा कडेला आपली दुकान लाऊन बसलेले आहेत हे दृश्य सहज दिसत आणि मग रस्त्यावर लोकांची भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी वाढत आहे
अस चित्र आम्हाला दिसत आणि त्यामुळे मग वाहतुकीला कित्येकदा अडथळा निर्माण होतोय हे दृश्य आम्हाला दिसतं.
त्यामुळे भाजी विक्रेत्यांसाठी आणि लोकांसाठी सुद्धा योग्य भाजी बाजाराची व्यवस्था असणे आणि ती भाजी बाजार नियमितपणे स्वच्छ होत असणे आज आवश्यक आहे जेणेकरुन भाजी खरीदे करण्यासाठी येणार्या लोकांना तिथे त्रास होऊ नये.
गावा खेड्याच्या ठिकाणी, तालुक्याचा ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा भाजी बाजार असणे आज आवश्यक आहे.
जिथे भाजी विक्रेते आपल्या भाज्या कोणत्याही अडथळ्याविना विकु शकले पाहिजेत आणि जिथे लोकांना सुद्धा भाजी खरीदे करताना त्रास कमी होईल.
त्याच बरोबर अश्या प्रकारची सुंदर आणि सुसज्ज बाजारं आमच्या भाजीवाल्यां साठी आज तयार होणे आवश्यक आहे.
जेणेकरून लोकांना भाजी खरेदी वेळी, भाजी विक्रेत्यांना भाजी विकण्यासाठी दररोज त्रास होऊ नये आणि त्यांना अनेको समस्यांना दररोज सामोरे जाव लागु नये.







