मुले शिकली वगैरे तर त्यांना रोजगार मिळेल अशी त्यांना अपेक्षा असते आणि अश्या प्रकारची अपेक्षा ठेवण्यात काहीही वाईट नाही.
कारण शिक्षण नसलं तरीही अनेक लोकं पूर्वी चांगले पैसे कमवत होते आणि आता सुद्धा कमावतात आणि त्यामुळे जर का शिक्षण घेतल्यानंतर मुलं रोजगाराची अपेक्षा ठेवतात तर यात काही गैर नाही .
करोडो मुलं आपल्याकडे दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडतात आणि शासनाने काढलेल्या जागा एखाद्या क्षेत्रातील अगदी कमी असतात . आणि त्याकरिता लाखो उमेदवार परीक्षेची तय्यारी करत आहेत असं चित्र आपल्याला बघायला मिळत.
त्यातले जे निवडले जातात त्यांची नय्या पार होते आणि , आणि ज्या मूलाना संधी मिळत नाही ते मुलं परत पुढच्या परीक्षेसाठी तयारी ला लागतात . आणि अश्या प्रकारे हळहळू वर्षे निघत जातात; विद्यार्थी वर्षानुवर्षे त्या परीक्षांची तयारी करत राहतात; मात्र त्यातील फार कमी जणांना पुढे जाण्याची संधी मिळते,.
तर बाकीचे अनेक जण वर्षो न वर्षे या वर्षी मला संधी मिळेल ह्या आशेने प्रयत्न करत असतात . आणि यशाची अपेक्षा असणे यात मुळीच वाईट नाही अनेक मुलांना आपल्याकडील वाटत कि आपण या ठराविक क्षेत्रातत गेलो तर जीवनाचं चीज होईल नाही तर जीवन व्यर्थ जाईल ,
त्यामुळे अनेक मुलांना बाकीचा क्षेत्रातील दारं दिसत नाही किंवा योग्य सल्ल्ला हा त्या काळात त्यांना मिळत नाही आणि त्यांचा कडून सुद्धा बाकीचा क्षेत्राकडे लक्ष हे दिल्या जात नाही .
आणि त्यामुळे कित्येकदा अभ्यास करून आणि चांगले गुण मिळवून सुद्धा, अनेक मुलांची महत्त्वाची वर्षे वाया जातात. दुसरीकडे, दरवर्षी मोठ्या संख्येने मुलं , जर का चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असतील, परंतु त्यांना स्थानिक पातळीवर सुद्धा योग्य प्रोत्साहन मिळत नसेल आणि रोजगार मिळत नसेल, तर ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब असते.
तिकडे आपण बघतो कि बाहेरून येणाऱ्या कंपन्या ह्या वाढत आहे आणि स्थानिक व्यवसाय उद्योगधंदे हे बंद पडत आहेत ; तिकडे शिकूनसुद्धा रोजगार नसल्यामुळे. साहजिकच तरुण मुलांमध्ये नैराश्य आणि ताण वाढतो आहे, अनेक तरुण-तरुणी आपल्याला बघायला मिळते कि ते नियमातीपणे नशेचा आहारी जातात, चुकीचा गोष्टींमध्ये गुंततात किंवा मग चुकीचा व्यवसायात सुद्धा पडतात.. तर अश्या प्रकारचा समस्या ह्या तरुण युवकांमध्ये आणि तरुणींमध्ये सुद्धा निर्माण होतात
त्यामुळे जर का मोठ्या प्रमाणात दर वर्षी मुले उत्तीर्ण होऊन निघत असतील, तर त्यांचं शिक्षण वाया जाणार नाही त्यांची उमेदीची वर्षे वाया जाणार नाही याची काळजी घेणे सुद्धा आपलं म्हणजे प्रशासनाचं काम आहे असं वाटत .
पुढे , आपण बाहेरील उद्योग धंद्यांना प्रोत्साहन देत आहोत ही चांगली बाब आहे, परंतु आपल्या स्थानिक व्यवसायांनाही तितकेच प्रोत्साहन देणे आज आपल्यासाठी तेवढच महत्त्वाच आहे. त्याचसोबत , मुलांमध्ये ही जागरूकता निर्माण करणे देखील महत्त्वाचे आहे की, होय, तुमच्यासाठी फक्त दोन चार क्षेत्रे नाहीत आहेत, तर अशी अनेक वेगवेळे क्षेत्र आहेत जिथे तुम्ही जाऊन त्या जगात रंग भरू शकता.
आणि कुठे संधी नाही मिळाली, तर काय झालं शिक्षण आम्ही घेतलेलं आहे, क्षेत्र अनेक आहेत , जिथे तुम्ही जाल तिथे परिश्रमाने आणि प्रामाणिकपणाने त्या जगात रंग भरा!







