सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले जी यांचा काल निधनानंतर अनेक राजकीय क्षेत्रातील, चित्रपट क्षेत्रातील , क्रीडा क्षेत्रातील आणि संगीत क्षेत्रातील लोकांनी त्यांना श्रद्धांजली दिली .
त्याच बरोबर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सुद्धा त्यांचा निधनावर दुःख व्यक्त करताना म्हंटल कि आशा भोसले जी यांनी आपल्या मधुर आवाजाने आणि आपल्या अप्रतिम प्रतिभेद्वारे आपल्या चाहत्यांचा मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली .
सगळ्या प्रकारचा संगीता मध्ये मिसळून जाण्याची त्यांची प्रतिभा हि लोकांचं मन जिंकून घ्यायची . आपल्या सुमधुर गाण्यामुळे त्यांनी अनेक चाहते निर्माण केले
आणि त्यांनी हिंदी , मराठी , बंगाली , तामिळ आणि गुजराती सारख्या भाषेमध्ये सुद्धा गायन केलं आणि आपली वेगळी छाप त्यांनी त्यांचा चाहत्यांचा मनावर सोडली:
अशा भोसले जी यांचा आवाजात जेवढी कोमलता होती तेव्हढाच त्यांचा स्वभाव हा साधा आणि सरळ होता. जेव्हा केव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली त्यावेळी संगीत आणि कला या विषयवार बरीच चर्चा हि व्हायची .
अश्या भावना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आशा भोसले जी यांना श्रद्धांजली देताना आपल्या सोशल मीडिया पानावर मांडल्या आणि जरी त्या आमच्यात नसल्या
तरी त्यांचा आवाजाद्वारे आणि त्यांचा गाण्यांद्वारे ते सदैव त्यांचा अनेको चाहत्यांचा मनोरंजन पुढे सुद्धा करत राहतील







