गेल्या काही वर्षांत मोदी सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे, आदिवासी भागांमध्ये मूलभूत सुविधांपासून ते उच्च शिक्षणापर्यंतच्या क्षेत्रात बरेच सकारात्मक बदल बघायला मिळत आहे .
आदिवासी समाजाची सांस्कृतिक ओळख जपण्याच्या आणि त्यांचा जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्याच्या प्रयत्नांमुळे आज या समाजात एक नवा आत्मविश्स्वास आपल्याला बघायला मिळत आहे .
येणाऱ्या काळात आमच्या सरकारच्या कल्याणकारी योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचा आमच्या प्रयत्न असेल.
त्याच बरोबर आपल्याला बघायला मिळते कि आज आदिवासी भागांतील लोकांचा प्रगतीचा वेग अधिक वाढला आहे आणि यापुढे सुद्धा आमच सरकार आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करत राहणार आहे
या प्रकारचं मत गुजरात चे उपमुख्य मंत्री हर्ष सांघवी यांनी भरूच जिल्ह्यात आयोजित आदिवासी गौरव संमेलनात मांडली
त्या दरम्यान ते म्हणाले कि या कार्यक्रमात मला आदिवासी बांधवांशी झालेल्या संवादातून त्यांना सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून अधिक जवळून समजून घेण्याची संधी मिळाली..







