वर्षभर म्हणा किंवा संपूर्ण पाच वर्षाचा काळात सुद्धा त्या गावात ढुंकून न पाहणारे लोकं तुम्हाला निवडणूकीच्या प्रचाराच्या वेळी दिसतात. लोकांची काय परिस्थित आहे. गावा गावात काय परिस्थिती आहे. आपल्या मतदार संघाचा विकास झाला की नाही. लोकं गावात कोणत्या समस्यांनी ग्रस्त आहेत या सगळ्यांची यांना संपूर्ण कार्यकाळात कल्पना नसते.
गावातील लोकं सुद्धा म्हणतात पुढारी आमच्या मतदार संघातील ढुंकून सुद्धा बघत नाहीत जो पर्यन्त पुढली निवडणूक येत नाही.
लोकांचे कित्येक खायचे वंदे असतात. उद्योग धंधे बुडायला निघालेले असतात. गावात बेरोजगारीची समस्या असते. गावात लोकांच्या आरोग्याचे प्रश्ण निर्माण झालेले असतात. स्त्रियांचे, तरुणांचे, आबालवृद्धांचे प्रश्ण असतात. गावाच्या विकासाचे प्रश्ण असतात.
मात्र गावात तुम्हाला काही विकास झालेला दिसत नाही त्याच्या एवजी जे पुढारी मागच्या निवडणूकीच्या वेळी, प्रचाराच्या वेळी येऊन गावकर्यांना अनेक आश्वासने देऊन गेले होते ते मात्र श्रीमंत अधिक झाल्याचा बातम्या कुठल्या ना कुठल्या वर्तमानपत्रात छापुन येत असतात आणि इकडे ज्या पुढाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात भेटी गाठीच दिल्या नाहीत त्या गावांची शहरांची समस्या सार्या गावाला माहिती असते.
लोकं आपल्या आपल्यातच बोलत असतात काय आमचे पुढारी लोकं, दर वर्षी येऊन नुसते पुड्या सोडून जातात आम्हाला मूर्ख बनवून जातात आणि आम्ही यांच्या वर किती विश्वास टाकतो मात्र काम काही ही लोकं आमच्या गावातील करत नाहीत. निवडणुकीच्या वेळी आले का आम्हाला कुत्र्या मांजरां सारखे, गाई ढोरं, शेळ्या बकर्यां सारखे हे आम्हाला घेऊन येतात.
कितीतरी आम्ही त्याचामध्ये गावचे गरजू, गरीब, कामगार, मजूर, शेतकरी लोक असतो. मात्र बघायला मिळते की उन्हातान्हात आम्हाला बसवल्या जाते आणि हे आम्ही तुमच्या लोकांसाठी हे करू, ते करू, गावाचा, शहराचा, विकास करू. गावात चांगले आरोग्य केंद्रे सुरू करू त्याच बरोबर, गावात रस्ते वगैरे उत्तम करू, गावातील तरुणांना योग्य रोजगार मिळावा या साठी वगैरे प्रयत्न करू अश्या पोकळ बाता केल्या जातात.
मात्र यातील कित्येक तर फक्त आश्वासने आणि थापा असतात जी आश्वासने कधी पूर्ण होत नाहीत. गावात फक्त निवडणुक प्रचाराच्या वेळी हे भुंकायला येतात भुंकून भुंकून ते निघून जातात.
या पेक्षा दुसर काही नवीन बदल तिथे बघायला मिळत नाही. गावाचा किंवा एखाद्या क्षेत्राचा विकास काही होत नाही आणि गावकरी प्रत्येक निवडणूकीच्या वेळी त्याच प्रकारे आशेने मेंढरासारखे येऊन तिथे त्या सभेत त्या पुढाऱ्यांचे पोकळ आश्वासने आणि भूलथापा ऐकायला येऊन बसतात.
आणि हे पुढारी येऊन बिचार्या गावकर्यांसमोर पुड्या सोडून चाललेले जातात. गावकरयांच्या कित्येक चेहर्यावर आशेचे भाव असतात. मात्र त्या अशा अपेक्षा कधी पूर्ण होताना दिसत नाहीत. तिकडे मात्र जे पुढारी आश्वासने देऊन गेले होते त्यांची सम्पति, त्यांच्या गाड्या, त्यांच्या जमिनी, त्यांच्या मालमत्ता, त्यांचे बंगले, वाढतच जातात आणि गाव आणि गावकरी मात्र भिकारी बनून राहतो.
साधी बाब कित्येक गावकर्यांना कळत नाही की तुमच्या मतांचा योग्य प्रकारे वापर करण्यात येत नाही आहे किंवा तुमच्या, तुम्हाला कित्येकदा गावातील लोकांना कित्येक पुढाऱ्यांन कडून लोकांना मध्ये जाती जातीचे विष पसरून मने खराब करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामुळे मग गावचा विकास, शहराच्या विकास खोळंबतो आणि फक्त काहीच लोक श्रीमंत होताना दिसतात.
आणि ही मोठी समस्या आहे आजच्या काळात सुद्धा. बिहार सारख्या राज्यामध्ये आता निवडणुका झाल्या. तिथे अनेको वर्षापासुन तेच नकारात्मक राजकारण आहे त्यामुळे तिकडच्या लोकांच्या समस्या अनेक असतात. तिथल्या लोकांचा स्थलांतराला आणि बेरोजगारीला खऱ्या अर्थाने तिथलीच लोक जबाबदार आहेत.
विकास नसल्यामुळे तिथल्या लोकांच्या दररोजच्या समस्या कठीण आहे.







