काल भारताने t ट्वेंटी विश्वचषक जिंकला. प्रतिस्पर्धी त्यांना मिळाला शेवटच्या सामन्यासाठी न्यूझीलंड .
t ट्वेंटी विश्वचषकाचा हा सामना गुजरात मधील, अहमदाबाद येथील नरेन्द्र मोदी स्टेडियम वर भारत आणि न्यूझीलंड या दोन संघामध्ये खेळण्यात आला.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला आधी फलंदाजी साठी आमंत्रित केलं.
भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ गडी गमावून २५५ धावा काढल्या.
ह्या t ट्वेंटी विश्वचषकातील शेवटच्या सामन्यात कोणत्याही संघाकडून काढण्यात आलेल्या सर्वात अधिक धावा होत्या
भारताकडून संजू सॅम्सन याने सर्वाधिक सर्वाधिक ८९
धावा काढल्या. त्याचा पाठोपाठ ईशान किशन याने ५४ धावा काढल्या. त्यानंतर अभिषेक शर्मा याने ५२ धावा काढल्या.
न्यूझीलंड कडून जेम्स निशीम याने ४६ धावा मोजून ३ गडी बाद केले.
धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड चि फलंदाजी ही ढेपाळतांना दिसली. सुरवातीला वरच्या फलनदाजांची सुमार कामगिरी हि त्यांचा कडून बघायला मिळाली
आणि त्यांचे फलंदाज हे मोठ्या धावा काढण्यात आणि मोठी पार्टनरशिप करण्यात अपयशी होताना दिसले त्यामुळे न्यूझीलंड चा संघ हा फक्त १९ षटकांत १५९ धावा काढू शकला
त्यांच्याकडून टिम सेफर्ट याने सर्वाधिक ५२ धावा केल्या; तर भारताकडून गोलंदाजी करतांना बुमराह ने सर्वाधिक १५ धावा देऊन ४ बळी घेतले.
अक्षर पटेल ने २७ धावा देऊन ३ बळी घेतले आणि अश्या प्रकारे भारताने हा विजय शेवटी ९६ धावांनी साकार केला.
हा भारताचा तिसरा t ट्वेंटी विश्वचषक विजय होता या आधी भारताने २००७ मध्ये, २०२४ मध्ये आणि आता २०२६ मध्ये t ट्वेंटी विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली आहे .







