बांगलादेशातून धार्मिक छळामुळे बांगलादेशातून भारतात आश्रयाला आलेल्या आलेल्या हिंदू , शीख आणि जैन निर्वासितांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA ) च्या चौकटी अंतर्गत पुढील सहा महिन्यात भारतीय नागरिकत्व देण्यात येईल.
या प्रकारची माहिती केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह यांनी जनतेला पश्चिम बंगाल मधील सिलिगुडी येथे माध्यमांशी बोलताना दिली .
त्याच बरोबर त्यांनी हे स्पष्ट केलं कि पश्चिम बंगाल मध्ये अवैध स्थलांतराला आम्ही येणाऱ्या काळात प्रतिबंध लावण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत .
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांमधून धार्मिक छळामुळे (३१ डिसेंबर २०१४) पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत नागरिकत्व मिळते.







