केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच सिंगापूरचा दौरा केला .या दौऱ्यामध्ये त्यांनी चौथ्या भारत ,सिंगापुर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेचे नेतृत्व केले .या बैठकीचा उद्देष दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापारिक संबंध अधिक दृढ करणे हा होता .
या दोऱ्यात निर्मला सीतारमण यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि इलेक्ट्रॉनिकी व माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री जितिन प्रसाद हे देखील सहभागी झाले होते.
या बैठकीत प्रगत विनिर्माण ,डिजिटलायझेशन, आरोग्य व वैद्यकीय क्षेत्र , कनेक्टिव्हिटी, कौशल विकास आणि शाश्वत विकास या सहा महत्त्वाच्या क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.







