खेळांना आम्ही एवढ महत्व देत आहोत अस म्हणतो. मात्र, बघायला फक्त एवढ मिळत की क्रिकेट सारख्या खेळला प्रचंड मह्त्व या दिवसांत मिळत आहे आणि त्यामुळे जिकडे तिकडे क्रिकेट चे सामने होतांना आणि क्रिकेटच्या सामन्यांच आयोजन होताना दिसत.
आणि त्यातून मात्र कोणते मूलं किवा खेळाडू समोर येत आहेत. खरच का खेड्या पाड्यातील उदयोन्मुख आणि प्रतिभा असलेले परिश्रमी खेळाडू समोर येत आहेत की तिथेही खालून चिरीमिरी देऊन त्याच लोकांना समोर आणले जात आहे ज्यांना तेथील क्रिकेट प्रशासन किंवा तेथील ठरविक संघ निवड करणारे, लोकं समोर आणू इच्छितात आणि खेळवू इच्छितात.
कारण कित्येक खेड्यांत या दिवसांत अनुभवायला मिळते की कित्येक क्रिकेट खेळणारे खेळाडू अनेक वर्षे देऊन सुद्धा, साधं जिल्हा पातळी वर सुद्धा खेळू शकत नाही आणि कित्येक खेळाडू अनेक वर्षे परिश्रम करून सुद्धा त्यांचा हाती काही लागत नाही. कारण तिथे सुद्धा खालून पैसा द्यावा लागतो किंवा आणि तिथेसुद्धा कित्येकांना पैसा वाटावा लागतो. तर अशी परिस्थित असते .
तिकडे कित्येकदा जिल्हा पातळीवर खेळाडूंना खेळण्यासाठी चांगले मैदाने नसतात असेल तर त्या मैदानांमध्ये योग्य त्या सोयी सुविधा नसतात. अनेक जिल्ह्यात आणि तालुक्याचा ठिकाणी, गाव पातळीवर सुद्धा क्रिकेटसाठी किंवा बाकीच्या खेळांसाठी सुद्धा योग्य त्या सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. क्रिडा क्षेत्रासाठी जो पैसा निधी म्हणुन सरकार कडून येतो तो पैसा कित्येकदा ते क्रिडा मैदाने चांगले आणि सुसज्ज बनविण्यासाठी वापरला जात नाही त्याऐवजी तो सारा पैसा, एकतर अधिकारी वर्ग आणि तिथले पुढारी गिळंकृत करून टाकतात आणि मग आम्हाला बघायला मिळते की गावातले पुढारी सुद्धा एक नाही तर चारचार आणि त्या पेक्षा अधिक वाहने घेऊन गावात आणि शहरात फिरत असतात आणि मौजमजा करत असतात.
त्याचबरोबर अधिकारी सुद्धा बक्कळ श्रीमंत होत जातात. पगार त्यांचा कमी असतो मात्र गाड्या बंगल्यांची त्यांचा कडे कमतरता नसते आणि त्याच गावात शिरल्यावर आपल्याला अनुभवायला मिळते की गावातील मूल चड्डी वर फिरत आहेत. गावातील लोकांची परिस्थित बिकट आहे, तिथे सोयी सुविधांची बोंब आहे. लोकं समस्यांमुळे प्रचंड त्रस्त आहेत. गावात किंवा तालुक्यात किंवा जिल्हा पातळीवर खेळांसाठी मैदाने नाहीत असेल तर त्या मैदानांची परस्थिति वाईट आहे. येणारा निधी गावातील किंवा, तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न होत नाही आहे.
अशी परिस्थिती कित्येक गावांमध्ये असते. क्रिकेट व्यतिरिक्त मूलं अनेक वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड दाखवतांना आम्हाला दिसतात. खोखो, कबड्डी, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, गोळा फेक,पोहणे, नेमबाजी, क्रिकेट, कित्येक मूलं अनेक वर्षापासुन चांगले धावपटू होण्याचा सुद्धा सराव करताना दिसतात.
कित्येक मूलं अनेको वर्षापासुन कुस्तीचा सुद्धा सराव करत असतांना दिसतात. यात आपले पारंपरिक खेळ सुद्धा आहेत. तर अश्या खेळांना सुद्धा चांगला पाठींबा मिळायला हवा. मात्र तो फार कमी मिळतांना दिसतो. त्या मुळे या खेळांमध्ये अनेको वर्षे घालवून सुद्धा कित्येक चांगल्या आणि प्रतिभावान खेळाडूंच आयुष्य अंधकारमय असतं. कारण यांना कित्येकदा ना पाठींबा मिळत ना त्यांना समोर राज्य पातळीवर किवा राष्ट्रीय किंवा अंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यास त्या प्रकारे सहकार्य आणि पाठींबा मिळत. तर मग यांचे कित्येक वर्षे परिश्रम करून सुद्धा अश्याच प्रकारे वाया जातात आणि त्यानंतर काही निवडक खेळाडू सरकारी नोकरीत लागतात तर बाकीच्यांना मग आपला क्षेत्र सोडून कुठेतरी हमाली करायला जावं लागत, किंवा चौकीदार करावी लागते तर कुठे ते धान्याचे पोते उचलण्याचे काम करतांना दिसतात तर कुठे ते कोणत्या हॉटेलात काम करतांना दिसतात. नाही तर गावातील पिढ्यांचा मागे त्यांचे चमचे म्हणून चमचे गिरी करतांना दिसतात.
तर त्यामुळे फक्त क्रिकेटलाच प्रोत्साहन देणे आणि बाकीच्या मूळ खेळांना संपूर्णतः दुर्लक्षित करणे योग्य नाही अस वाटतं. देशात वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड असणाऱ्या आणि परिश्रम करणार्या खेळाडूंची खान आहे आणि कमतरता सुद्धा नाही. चांगली क्रिडा मैदाने, योग्य सोईसुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगल्या खेळाडूंना वर आणण्याचा प्रयत्न होणे त्याच सोबत आज आवश्यक आहे. आणि जो पैसा जा कार्यासाठी सरकार निधी म्हणुन मंजूर करते तो त्या गोष्टी सुसज्ज आणि तयार करण्यात योग्य पणे वापरण्यात आला तर कित्येक जिल्ह्यांत, तालुका पातळीवर, खेड्यांत सुद्धा अनेक चांगले बदल आम्हाला बघायला मिळू शकतात.
कारन आपल्याकडे चांगल्या वेगवेगळ्या खेळांत पारंगत असलेल्या प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाहि. कित्येकदा सोयीसुविधा, सहकार्य आणि पाठींबा न मिळाल्यामुळे अनेको कर्तबगार खेळाडू देशाच नाव उज्वल करू शकत नाही. तर अस होतं







