खेड्यापाड्यातील मुलांमध्ये प्रचंड प्रतिभा ही असते मात्र त्या प्रतिभेला कित्येकदा प्रोत्साहन मिळतांना दिसत नाही आणि त्यामुळे पुढे त्यांची प्रतिभा ही वाया जाताना दिसते आणि असं चित्र आपल्याला बघायला मिळते .
आपल्याकडे अनेक खेळ हे खेळले जातात मात्र तिथे आणि त्या क्षेत्रात खेळणारे गरिबांचे किंवा सामान्य घरातील मुलं कमी आणि श्रीमंतांचे आणि जातीवर आधारित मुलांची संख्या जास्त आहे अस चित्र तिथे सुद्धा दिसते . त्यामुळे मग आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची कामगिरी खेळांत कित्येकदा अतिषय सुमार दर्जाची होतांना दिसते.
कारण तिथे खेळांमध्ये सुद्धा आपल्याला भेदभाव हा होतांना दिसतो . प्रचंड प्रतिभा असून सुद्धा , कित्येकदा मुलांना ज्या प्रकारचं सहकार्य मिळायला हवं आणि जी साथ मिळायला हवी ती साथ त्या अनेक मुलांना मिळत नाही किंवा मिळतांना दिसत नाही .
सोयीसुविधांच्या बाबतीत तर ते मागे पडताना दिसतातच , मात्र जरी अनेक चांगले खेळाडू खेड्या पाड्यातून तयार होत असले तरी , त्या मुलांना कित्येकदा जाती पातीच्या कारणाने डावलल्या जात नकळतपणे . त्यामुळे मग हे प्रचंड क्षमता असलेले खेळाडू कित्येकदा, मागे पडतात.
मग ते खेळ कोणतेही का असोनात. क्रिकेटचेच काय उदाहरण घ्यायचे , कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात . जरी सोयीसुविधा पुरेश्या नसल्या तरी. त्यांना योग्य मैदाने मिळत नाहीत , योग्य प्रशिक्षण मिळत नाही , आर्थिक पाठबळ मिळत नाही . तरीही ह्या सगळ्या कठीण परिस्थितून ते परिश्रम करून पुढे येत असतात .
मात्र भ्रष्टाचार हा खेळाच्या क्षेत्रात सुद्धा प्रचंड वाढला असल्यामुळे आपल्याला बघायला मिळते कि , इथे अनेको वर्षे परिश्रम करून आणि कष्ट करून सुद्धा अनेक खेळाडू साध्या जिल्हा पातळीवर म्हणा किंवा राज्य पातळीवर सुद्धा निवडले जात नाही किंवा त्यांना खेळायची संधी मिळत नाही . आणि तिथे सुद्धा त्याच खेळाडूंची वर्णी लागते ज्यांच्या साठी मोठ्या प्रमाणात जुगाड लावल्या गेला आहे आणि पैसा फेकला गेला आहे आणि त्यांचा गुणवत्तेचा विचार न करता आधी जातीचा विचार केला गेला आहे .
त्यामळे मग , साध्या घरघुती सामन्यांत सुद्धा तिथला संघ किंवा खेळाडू सतत मागे पडताना दिसतात आणि राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांची सातत्याने घसरण होतांना दिसते कारण ,
कारण जुगाड लावून खेळाडू वर पाठवलेले असतात आणि त्यांच्या मध्ये गुणवत्तेचा अभाव असतो आणि जे खेळाडू परिश्रम करून तयार झालेले असतात ना त्यांचा साठी कोणी त्यांच्या बाजूला उभा होणारा असतो ना त्यांची शिफारस करणारा असतो
आणि कधी त्यांना जाती मुळे डावलल्या जात तर कधी त्यांचा त्वचेचा रंगामुळे ते डावलल्या जातात कधी गरिबाच लेकरू म्हणुन डावलल्या जातं. तर अशी परिस्थीती असते.
त्या मुळे शेवटी देशाला अशे खेळाडू मिळत नाहीत मग ते कुठल्याही क्षेत्रातले खेळाडू का न असोत .
आणि ही परिस्थिती आहे .
या खेळांच्या किंवा खेळांच्या मैदानांच्या विकासासाठी येणारा निधी मात्र स्थानिक पातळीवरच कित्येकदा गायब करून दिला जातो आणि त्याची हवा सुद्धा कुणाला लागत नाही . आणि तिकडे अंधारात , धुळीत , काट्या गोट्यात आणि काचेच्या धावण्याचा पट्टीवर मुलं दररोज धावण्याचा , खेळण्याचा सराव करत असतात . पाण्यावाचून , सवलीविना आता सुद्धा, योग्य खेळण्याचा साधनांवाचून .







