फर्स्ट पोस्ट न्यूज ने, मांडलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताचा किरकोळ महागाई दर हा वाढून ३.२१% वर पोहोचला आहे. जो दर जानेवारी महिन्यात २.७४% इतका होता
ही आकडेवारी २०२४ हे आधारभूत वर्ष मानून तयार करण्यात आलेल्या सुधारित ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित आहे. जागतिक व्यापारातील अनिश्चिततेमुळे आणि पश्चिम आशियातील वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ अनुभवायास मिळत आहे असं फर्स्ट पोस्ट या न्यूज माध्यमाचं म्हणणं आहे .
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक तेल पुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे हि आकडेवारी समोर आली आहे असं ते म्हणतात .
त्याचबरोबर अर्थतज्ञांचं मत आहे कि, जर पुरवठ्यावरील निर्बंध दीर्घकाळ कायम राहिले, तर भारतासारख्या ऊर्जेवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये आयात केलेल्या गोष्टींवर अधिक महागाईची मार बसेल .
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या माहितीनुसार, सर्वाधिक वाटा असलेल्या अन्नधान्य महागाईचा दर जानेवारीतील २.१३% वरून फेब्रुवारीमध्ये वाढून ३.४७% वर पोहोचला आहे.
त्याचबरोबर ग्रामीण भागातील महागाईचा दर २.७३% वरून वाढून ३.३७% झाला आहे , तर शहरी भागातील महागाईचा दर २.७५% वरून किंचित वाढून ३.०२% वर पोहोचला.
हे दोन्ही दर भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या ४% या मध्यम मुदतीच्या महागाई उद्दिष्टापेक्षा कमीच राहिले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.
(ही माहिती फर्स्ट पोस्ट न्यूज ने मांडलेल्या माहितीवरून घेण्यात आली आहे.)







