प्रदूषणाचा त्रास हा भारतातील अनेक शहरांत लोकांना अनुभवायला मिळतो. त्यामुळे लोकं प्रचंड त्रस्त आहेत.
लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने जागेची कमतरता सगळीकडे लोकांना जाणवायला लागली आहे.
अनेक शहरांत या दिवसांत आम्हाला बघायला मिळते की लोकं जागेच्या कमतरतेमुळे दाटीवाटीने राहत आहेत आणि त्यामुळे जंगले, झाडे आणि जंगली झुडपे आणि गावातील झाडे सुद्धा, लोकांना कापावी लागत आहेत.
झाडे किंवा जंगले ज्या वेगाने कमी होत आहेत त्या वेगाने मात्र झाडे लावण्याचा प्रमाण आपल्याला दिसून येत नाही त्या मुळे पर्यावरणाचा समतोल वेगाने ढासळतो आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या गावात किंवा शहरात अनेक समस्याना सामोरे जाव लागत आहे.
प्रदूषणाचा त्रास हा भारतातील अनेक शहरांत लोकांना अनुभवायला मिळतो. त्यामुळे लोकं प्रचंड त्रस्त आहेत. मात्र त्या राज्यातील पर्यावरण विभाग काय झोपेत आहे गेल्या कित्येक वर्षापासुन? असा सुद्धा प्रश्ण सामान्य माणसाला पडतो. कारण लोकांना प्रदूषणामुळे श्वसनाचे आणि त्वचेचे आणि अश्या अनेक प्रकारचे रोग त्यांना जडत आहेत हे लोकांना सातत्याने अनुभवायला मिळत आहे.
त्याचबरोबर प्रदूषणामुळे अनेक वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अस सुद्धा अनुभवण्यास येत. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे आम्हाला बघायला मिळत की पावसाळ्याचा दिवसांत सुद्धा लोकांना उष्णतेच्या ताप सहन करावा लागत आहे आणि हिवाळ्यात सुद्धा लोकांना उकडत आहे अश्या गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळत आहे.
तर यावर काम करणे प्रचंड आवश्यक आहे. बाकीचे देश पर्यावरणा बद्दल सजग असताना आमच्या कडे मात्र पर्यावरणाचा बोजवारा वाजलेला दिसतो. दिल्ली सारख्या शहरात दरवर्षी लोकं प्रचंड प्रमाणात वायू प्रदूषणामुळे त्रस्त असतात.
त्याचबरोबर लोकसंख्या प्रचंड वाढत असतांना जर का झाडे सुद्धा वेगाने गायब होऊ लागली तर शहरातील लोकांना प्रचंड समस्यांना सामोरे जाव लागेल. पाण्याचे गंभीर प्रश्ण निर्माण होतील. जमिनीत, जमिनीवर वृक्षच् नसल्यामुळे पाणी उरणार नाही कारण अत्यंत वेगाने झाडे नसल्यामुळे जमिनींची धूप होत राहणार.
त्यामुळे जितक्या वेगाने झाडे कापली जात आहेत त्याच वेगात झाडे लावण्याच सुद्धा काम हाती घेणे आवश्यक आहे. झाडे लावा पर्यावरण वाचवा असा उपक्रम आज हाती घेणे आवश्यक आहे.







