ह्या दिवसांत आपण बघतो कि छोट्या मोठ्या शहरांमध्ये लोकांना अनेक समस्यांना तोंड द्याव लागत आहे. शहरांतील रस्ते ट्रॅफिक मुळे छोटे पडताना बघायला मिळतात मोटार गाड्या, दुचाक्या आणि मोठी वाहने यांची
संख्या या दिवसांत सगळीकडे वेगाने वाढत असल्याचे आपल्याला बघायला मिळते आणि हे सत्य आहे आणि याकडे आपण डोळे झाक करू शक नाही .
त्यामुळे शहरातील अश्या वर्दळीच्या ठिकाणी आणि ट्रॅफिकमध्ये लोकांना दिवसभर अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत.
आणि ज्या शहराची लोकसंख्या अधिक आहे तिथे आपल्याला बघायला मिळते कि तिथले लोकं मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या समस्यांना तोंड देत आहेत. त्याचबरोबर शहराच्या आतील भागात जिथे रस्ते अधिक छोटे आहेत आणि ज्या शहरांमध्ये वाहनांच्या ये जा करण्यासाठी जागा कमी आहे तिथे लोकांना अधिक त्रास होतोय आणि अनेक आव्हानांना तिथे त्यांना तोंड द्यावं लागत आहे .
त्याचबरोबर वाहनांची संख्या छोट्या मोठ्या शहरांत आणि तालुक्यांत अधिक वाढल्याने प्रदूषणाच्या प्रमाणात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे हे बघायला मिळत .
देशातील काही काही शहरांमध्ये हवेच प्रदूषण हे प्रचंड मोठं आहे त्यामुळे तिथल्या लोकांचं जीवन अधिक कठीण होत .त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागत त्याच बरोबर त्यांना वाहने चालवताना सुद्धा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत .
तिकडे लोकसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे. वाहनेही वेगाने वाढत आहेत आणि त्यामुळे रस्ते लोकांसाठी छोटे पडताना दिसतात.
महाराष्ट्रातील हि काही शहरे जी दररोज हवेच्या प्रदूषणाला तोंड देत आहेत जसे की मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, बोईसर, नागपूर, पुणे आणि कदाचित ही संख्या जास्त असेल.
इतर देश वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असताना, आपली शहरे हवेने मोठ्या प्रमाणात दूषित असल्याचे दिसून येते. या वर आपल्याकडे सुद्धा आपल्या शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे
कारण प्रदूषणाचा समस्येमुळे अनेक लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात त्याचबरोबर आपल्याला कळते कि प्रचंड वायुप्रदूषणामुळे आपल्या क्षेत्रातील वातावरणाचा समतोल हा बिघडतो आहे .







