आज प्रत्येकजण शाळेत जाऊ शकतो आणि शिक्षण घेऊ शकतो मात्र पूर्वी प्रत्येकाला शिक्षण घेणे हे शक्य नव्हते, मात्र आज आपण बघतो की मग ते कोणीही असोत ते शाळेत जाऊ शकतात आणि शिक्षण घेऊ शकतात! या दरम्यान आपल्या समाजात हळूहळू अनेक बदल झालेत! त्याचसोबत या काळात आपण आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळलेले आहोत आणि अनेक तरुण तंत्रज्ञानाचं शिक्षण घेऊन सॉफ्टवेअर इंजिनिअर, सायबरसुरक्षा विश्लेषक, सॉफ्टवेअर डेव्हलपर, आयटी मॅनेजर आणि आणखी तंत्रज्ञानाशी निगडित क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करू शकतात!
मुलं ,मुली त्यांना हवे ते विषय शिकू शकतात आणि कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण करू शकतात!
लोकं त्यांचे व्यवसाय चालवू शकतात किंवा बँक कर्मचारी बनू शकतात किंवा रुग्णालयात नोकरी करू शकतात किंवा ते पोलिस विभागात किंवा सैन्यात प्रवेश करू शकतात. नौदल. किंवा हवाई दलात जाऊ शकतात .
कोणी कपड्याच दुकान चालवू शकतो . कोणी दागिन्यांचं दुकान चालवू शकतो . तर कोणी दुधाचं दुकान टाकू शकतो किंवा लस्सीचे दुकान टाकू शकतो किंवा मिठाईच दुकान चालवू शकतो किंवा मग चपलांचं दुकान टाकू शकतो किंवा ऑटोमोबाईलचं दुकान टाकू शकतो किंवा लोकं आपले छोटे मोठे हॉटेल किंवा रेस्टॉरंट चालवू शकतात!
ते शाळांत आणि महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी जाऊ शकतात तर अश्या प्रकारचे सकारात्मक बदल आपण आपल्या समाजात बघत आहोत. हे बदल हळूहळू आपल्या समाजात आले हे आपल्याला माहिती आहे .
या दिवसांत मुलं शाळेत बसून वेगवेगळे विषय शिकू शकतात! पण पूर्वी हे सगळ्यांसाठी शक्य होते का आणि अजूनही काही दुर्गम भागात आणि देशातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लोकांना प्रचंड समस्यांना आणि आव्हानांना तोंड द्यावे लागते आणि अश्या प्रकारचा फरक आपल्याला अनेक ग्रामीण भागात आणि देशातील खेड्यांमध्ये बघायला मिळतो.
दुसऱ्या बजावला, शहरांमध्ये मुख्यतः लोकांना चांगल्या सुविधा आणि चांगले शिक्षण, चांगल्या शाळा आणि चांगले महाविद्यालय त्याचबरोबर चांगले वातावरण त्यांना मिळतेय हे बघायला मिळत .
आणि तिकडे कित्येक ग्रामीण भागात आणि खेड्यापाड्यात आणि दुर्गम भागात परिस्थिती हि खूप हळूहळू बदलत असल्याचे आपल्याला अनुभवायला मिळते आणि तिथे आज अनेक मुलं आणि लोकं चांगल्या सोयी सुविधांपासून दूर आहेत असं आपल्याला अनुभवायला मिळते आणि हे चित्र आपल्याला गावांमध्ये आणि देशातील लहान शहरांमध्ये गेल्यावर स्पष्टपणे दिसून येते. त्यांना चांगल शिक्षण मिळत नाही. त्यांना चांगल वातावरण मिळत नाही . त्याचबरोरबर भेदभाव हा नियमितपणे तिथे होत असल्याचं लोकांना अनुभवयाला मिळत, त्यामुळे तिथे त्या क्षेत्रांमध्ये योग्य बदल घडवून आणण्यासाठी त्या सर्व लोकांना खूप काम करण्याची गरज आहे.
आपल्याला मुख्यतः शहरांमध्ये वेगळा भारत बघायला मिळतो आणि ग्रामीण भागात वेगळा भारत बघायला मिळतो . मात्र असं असलं तरी खऱ्या भारताचं चित्र आपल्याला ग्रामीण भागातच बघायला मिळतो.







