कधी रस्त्याने जात असा किंवा मग बसस्थानकावर बघा, किंवा मग रेल्वे स्थानकावर बघा, किंवा बाजारात बघा आपल्याकडे तारुण्यात येणारी मुले किंवा छोटी छोटी शाळेत जाणारी मुले काम करतांना दिसतात. कोणी समोसे विकतांना दिसतो. कोणी चहा विकतांना दिसतो. कोणी फळं विकतांना दिसतो. कोणी पाणीपुरी किंवा भजी किंवा जलेबी विकतांना दिसतो. तर कोणी कोंबडी विकायच्या तर कोणी खाटकाच्या दुकानात कामाला आहे अस बघायला मिळतं. कोणाचा रस्त्यावर चपला शिवायचा छोटासा दुकान आहे अस बघायला मिळत. तर कोणी फुलं किंवा गजरे विकत आहे अस बघायला मिळत आणि अतिषय कमी वयात हे इथे काम करत आहे बघायला मिळत; हे लक्षात घेण्यासारख आहे. आता ही छोटी छोटी मुलं किंवा शाळा महाविद्यालयात शिकणारी मुलं का काम करतात?कारण कित्येकांच्या घरची परिस्थिती बिकट असते. मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो. ह्या वयात शिकण्याचा, खेळण्याच्या वयात जेव्हा त्यांना कित्येकदा उपाशी रहाव लागत. कित्येकदा एकदा जेवायला मिळत किंवा मिळतही नाही. अंगावर कपडे घालायला नसतात कधी पायात चपला नसतात. तर त्या खेळण्या बागडण्याच्या दिवसात त्यांना जेव्हा दररोज परिस्थितीचे चटके बसत असतात. तेव्हा त्यांना हे कळते की आम्ही जर खेळत राहिलो. तर माझी बहिण कदाचित उपाशी राहील. माझी माय कदाचित उपाशी राहील. माझी आजी कदाचित उपाशी राहील. माझ्या घरात दिव्यात घालायला तेल राहणार नाही. दिव्यात घालायला तेल राहणार नाही तर माझ्या घरात अंधार राहील. आमच्या अंगावर घालायला कपड़े राहणार नाही. तर जरी त्यांच वय बाकीच्या मुलांसारखं खेळण्या बागड्ण्याच असत मात्र ते त्या मुलांसारखे खेळू शकत नाही. कितीही जरी आपल्याला अस वाटत की वय खेळण्या बागड्ण्याच आहे मात्र ते तो वेळ, तो दिवस वाया घालवू शकत नाही कारण घरी त्यांचा त्यामुळे दिवा जळणार नाही आणि घरातील लोकांना उपाशी रहाव लागेल. तर अशी अनेक मुले आणि मुली सुद्धा असतात. आणि जेव्हा आपन गावात फिरतो तेव्हा याची कल्पना येते. या मुलांना कितीही वाटलं की आपन सुद्धा खेळायला हव तरी ते खेळू शकत नाही. आणि ही परिस्थीती आपल्याकडील जे काही राज्ये आहेत आणि त्या राज्यातील गाव व खेडे व शहर आहेत तिथे सहज बघायला मिळते. तर ह्या प्रकारचा फरक आपल्याला आपल्याकडील अनेक भागांत बघायला मिळतो. ज्या वयात अनेक श्रीमंताची मुले किंवा सामान्य घरातील मुले ही खेळण्या बागडण्यात घालवत असतात त्या काळात ते घरातील लोकांसाठी भाजी भाकरी आणि घरात दिव्यात घालायला तेल मिळविण्यासाठी काम करत असतात. तर ही मुलं अश्या प्रकारे घडत असतात. ते वेगळया प्रकारे जीवन बघतात आणि अतिशय कमी वयात जबाबदार्या आल्यामुळे त्यांच्या मध्ये आणि बाकीच्या त्यांच्याच वयाचा मुलांमध्ये बराच वागणुकीमध्ये आणि वैचारिक पातळीमध्ये सुद्धा फरक बघायला मिळतो. मात्र कित्येकांच जीवन छोट्या वयात आणि छोट्या वयात काम करता करता पुढे सुंदर बनत जरी त्यांना त्यांच्या लहान वयात, खेळण्या बागड्ण्याचा वयात त्यांना बाकीची मुले जगतात आणि वाढतात त्या प्रकारे जगायला मिळाल नाही तरी.







