महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर आगपाखड करताना आपले मत मुंबई येथील शिवतीर्थ मैदानावर झालेल्या गुढी पाडवा मेळाव्यात मांडले,
१९ मार्चला मनसेची स्थापनेनंतरची पहिली सभा ही याच तारखेला झाली होती असं राज ठाकरे म्हणाले ,
राज ठाकरे या सभेत म्हणाले कि आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि ;
तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत .
आणि याच्या जोडीला अजून एक पेव फुटलं आहे ते म्हणजे विविध योजनांतून नागरिकांना काही ना काही मोफत द्यायचं.
मात्र नागरिकांना कधीच काही मोफत नको असतं, त्यांना चांगलं आयुष्य हवं असतं. पण हे भानच सरकारच कदाचित सुटलं आहे अश्या प्रकारचा भावना त्यांनी राज्यसरकारला धारेवर धरताना व्यक्त केल्या
२०२६-२७ चा राज्याचा अर्थसंकल्पाच उदाहरण देत राज ठाकरे म्हणाले कि सरकारनेच या बद्दल कबुली दिली की राज्यावर कर्जाचा बोजा हा ११ लाख कोटींचा आहे.
हे सगळं का घडलं कारण यामागे राज्य सरकारची नियोजनशून्यता हे कारण आहे . विकास ही विचारशील प्रक्रिया आहे याचं भान सुटल्याने हे सगळं घडलं आहे असं राज ठाकरे साहेबांचं त्यामागचं मत होत.







