छोट्या मोठ्या गावांना हागणदारी मुक्त करणे या दिवसांत आवश्यक आहे.
गावा खेड्यात अधिकाधिक प्रमाणात शौचालय तयार होणे आणि त्याचबरोबर सार्वजनिक शौचालये तयार होणे आज आवश्यक आहे.
एखाद दोन शौचालय तयार केली दाखवण्यासाठी त्याचा काही उपयोग नाही!
कारण ती शौचालय, कोणत्या कामाची नसतात. ना त्या शौचालयात पाणी असतं. ना त्या शौचालयांच्या बल्ब वगैरे जळत असतात.
आणि घाणेरडी प्रचंड असल्यामुळे ती दाखवण्यासाठी असतात.
गावा खेड्यातील शाळा महाविद्यालयात शौचालय असणे आणि योग्य अवस्थेत असणे तेवढच आवश्यक असत.
सरकारी कार्यालये आणि इस्पितळांमध्ये कधी कधी परिस्थिती गंभीर असते. मात्र या मुळे सार्वजनिक आरोग्य बिघडत. शाळा महाविद्यालयांमधील मुला मुलींच्या आरोग्याचा तिथे प्रश्ण निर्माण होतो! कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्ण निर्माण होतो! आणि आता हे बदल होणे आवश्यक आहे निधी हा ज्या कारणासाठी येतो तो जर त्या कार्यासाठी वापरला न जान यामुळे गाव खेडे हे विकसित होणार नाही आणि पुढे ते तसेच राहतील. तर प्रामाणिकपणे काम हे होने आवश्यक असते!
सार्वजनिक शौचालये असतिल तर त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांवर किंवा मैदानावर किंवा मोकळ्या जागी लोकं उघड्यावर शौचास बसणार नाही!
त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही आणि तो परिसर, ते मैदान किंवा ते रस्ते बरे राहतील त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्ण हा निर्माण होणार नाही!
गावातून वाहणार्या नद्यांच्या बाजूला लोकं येऊन कचरा टाकतात किंवा मग तिथे शौचास बसतात. तर त्यामुळे नद्यांच् आरोग्य बिघडत तर नद्यांचा पत्रात घाण टाकण्यास किंवा नद्यांचा बाजूला शौचास बसण्यास लोकांना प्रतिबंध असायला हवा.
जेणेकरून त्या नद्यांच् आरोग्य हे बिघडणार नाही आणि देशात अश्या नद्या असतात ज्या या दिवसांत प्रचंड घानी मूळे प्रदुषित झालेल्या लोकांना बघायला मिळते तर या कडे लक्ष देणे आणि यावर सुद्धा प्रामाणिकपणे काम होने आज आवश्यक आहे!






