सायबर गुन्हेगारी चे प्रकार या दिवसांत प्रचंड वाढले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर या दिवसांत अनेकांचे अकाऊंट असतात.
आणि या दिवसांत सायबर हॅकिंगच शिक्षण सुद्धा सहज मिळत असल्यामुळे अनेक तरुण तरुणी ते शिक्षण घेताना दिसतात.
कित्येक जण त्यातील आपल्या शिक्षणाचा उपयोग चांगल्या कार्यासाठी करतांना दिसतात आणि कित्येक आपल्या शिक्षणाचा उपयोग चुकीच्या मार्गाने पैसा मिळविण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी करताना दिसतात.
फेसबुक , इंस्टाग्राम, ट्विटर म्हणजे एक्स वाट्सअँप, टेलिग्राम आणि बाकीच्या आणखी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांचे खाजगी आणि सोशल अकाऊंट सहजपणे सायबर हॅकर कडून हॅक होताना दिसतात.
त्यामध्ये स्त्रियांचे, मुलींचे, व्यावसायिकांचे, राजकारण्यांचे, कलाकारांचे, सामान्य लोकांचे, शाळा महाविद्यालयात जाणार्या अनेक तरुण, तरुणींचे अकाऊंट सहजपणे या दिवसांत हॅक केले जातात.
आणि त्यानंतर कित्येकदा त्यांना त्यांचे छायाचित्र किंवा त्यांचे महत्वाचे मेसेज किंवा वैयक्तिक माहिती चोरल्या जाते आणि त्यांना सातत्याने मानसिक त्रास हा त्यांचा कडून दिला जातो. कित्येकदा मुलींचे छायाचित्र वगैरे प्राप्त करून त्यांचे वेगळे अकाऊंट बनवून ते चालवले जातात आणि कित्येकदा अनेकांना पैशांसाठी खूप त्रास दिला जातो आणि मानसिक त्रास हा दिला जातो!
त्याचबरोबर, कित्येकदा या परिस्थितीमध्ये या लोकांनी आपले पासवर्ड किंवा सिक्युरिटी सेटिंग्स वगैरे तपासून आणि नवीन पासवर्ड अनेकदा टाकून सुद्धा काहीही अर्थ नसतो कारण ते पासवर्ड हे सहजरीत्या हॅकर्स कडून ब्रेक केले जातात आणि अनेकांना त्यामुळे प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जाव लागतं.
आणि या दिवसांत त्या मुळे सोशल मीडियावर अनेकांचे अकाऊंट असले तरीही ते काही सुरक्षित नाही कारण सायबर गुन्हेगारांची आज खूप मोठी टोळी हि आज समाजात तयार झाली आहे आणि ते अधिकाधिक पैसा मिळविण्याच्या नादात आज चुकीच्या मार्गाने पैसा मिळविण्याचा मागे अनेकांचे आयुष उध्वस्त करण्याचा मार्गावर लागलेले दिसतात.
मात्र या गोष्टींवर नियंत्रण मिळवणे आणि लोकांना सायबर बुलिंगच शिकार होण्यापासून वाचवणे आवश्यक आहे . कारण अनेकांचे सोशल मीडिया अकाउंट आज या प्लॅटफॉर्म्स वर असतात आणि त्यामुअळे पुढे जाऊन त्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत.







