आतापासून लोकांना पाण्याचा त्रास जाणवायला लागतो. म्हणजे अजून हिवाळा संपायचा आहे.जमिनीतील पाण्याचा स्तर आणखी खालावत जातो. लोकांना आत्तापासून पाण्यासाठी धडपड करतांना बघायला मिळते. नळाचे पाईप या दिवसांत टाकण्यात येत आहे कुठे कुठे अस बघायला मिळते. म्हणजे लोकांना सुद्धा जरा सुखावल्या सारख वाटत की चला काही नाही तर नळ योजनेमुळे आता आमच्या घरात नळं येतील आणि आम्हाला पाणी मिळेल.
पण उन्हाळ्यात जमिनीतच पाणी नाही ५०० ५०० फुटांपर्यंत बोर मारून सुद्धा पुढचा उन्हाळा सुरू होत नाही तर पाण्याचा थयथयाट असतो.
गावात सगळीकडे परत उन्हाळ्यात बोर मारने सुरू होऊन जात. विहिरी वगैरे कोरड्या पडतात. नद्या कोरड्या पडतात. जलाशये कोरडे पडतात. पाण्याच्या टाक्या असेल तर कोरड्या पडतात.
तर नळ योजना सुरू केली आणि नळाला पाणीच येईना अशी परिस्थिती निर्माण झाली तर मग लोकांनी काय कराव?
नळ योजने द्वारे अनेकांना पाणी मिळेल ती बाब छानच आहे अनेकांना ज्यांच्याकडे पाण्याचा प्रश्ण आहे त्यांचा करिता खरच ही दिलासादायक बाब असेल.
मात्र त्या नळांना खरच पाणी येईल का की अख्या गावाला पाण्याचा टँकर वर अवलंबून रहाव लागेल?
त्यामुळे या दिवसांत जलसाठे वाचवणे, जलाशयातील पाणी वाचवणे. त्यांच शुद्धीकरण होत रहाणे आवश्यक आहे.
नद्यांना प्रदुषित होण्यापासून रोखणे आज आवश्यक आहे नद्या शुद्धीकरणावर अधिकाधिक कार्य होने आज आवश्यक आहे.
महाराष्ट्रामध्ये अश्या कित्येक नद्या आहेत ज्या प्रचंड प्रदुषित आहेत आणि प्रदूषणामुळे त्या नद्यांच् पाणी हे वापरण्यायोग्य राहत नाही. त्याचबरोबर अनेक कारखान्यांतून निघणार रसायन युक्त पाणी सुद्धा अनेक कारखान्यांमधून दररोज नद्यांमध्ये सोडल्या जात असल्या मुळे नद्या अनेक भागातील प्रचंड प्रदुषित होताना दिसतात.
त्याचबरोबर, छोटे मोठे जलसाठे हे लोकांना कचरा टाकण्याच ठिकाण वाटत असल्यामुळे गावातील सारा कचरा या नद्यांचा बाजूला किंवा जलसाठयांच्या बाजूला किंवा जलाशयात आणून टाकला जात असल्यामुळे नद्या आणि जलसाठे प्रचंड प्रदुषित होतांना दिसतात. आणि ही मोठी समस्या आहे. पाण्यातील जैवविविधतेला या मुळे प्रचंड धोका निर्माण होतांना आपल्याला अनुभवायला मिळतो.
त्यामुळे आज फक्त नळाचे पाईप टाकून आणि नळ योजना राबवून काम होणार नाही तर पाण्याचे साठे वाचवणे आवश्यक असणारी बाब आहे.







