ज्या लोकांना तुम्ही तुमच्या गावांचा किंवा शहरांच्या विकासासाठी निवडले आहे, ते तुमच्या गावांचा आणि शहरांचा विकास करण्यात महत्वाचं काम करतात. लोकांच्या समस्या समजून घेणे, गावातील प्रश्न समजून घेणे आणि त्यांना उपलब्ध असलेल्या वेळेत नियमितपणे त्या समस्यांवर काम करणे हे आवश्यक असते.
तुमची गावे सुंदर बनवण्याचे प्रश्न. गावांमध्ये रस्ते बनवणे आणि चांगले रस्ते उपलब्ध करून देणे, बाजारांच्या समस्या आणि चांगले बाजार उपलब्ध करून देणे. चांगल्या शाळा, रुग्णालये आणि बस थांबे बनवणे. लोकांच्या समस्या निःपक्षपातीपणे समजून घेऊन त्यावर काम करणे हे यादरम्यान आवश्यक असते. जलस्रोत स्वच्छ करणे, पाण्याची सोय उपलब्ध करून देणे आणि उपलब्ध जलसाठ्यांमध्ये पाणी साठवणे. शेतकरी, गावातील छोटे व्यापारी आणि कामगारांच्या समस्या सोडवणे ह्या गोष्टी त्यादरम्यान करणे आवश्यक असते.
पण बहुतेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये आपण बघतो की, या गोष्टी लोकांच्या प्रतिनिधींकडून होताना दिसत नाही ज्या लोकांना आपण आपल्या गावांचा विकास करण्यासाठी आणि गावातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडले आहेत, ते लोकांच्या आणि गावकऱ्यांच्या मनात विष पेरताना दिसतात.
आजही आपल्याला बघायला मिळते कि मोठ्या संख्येने लोकं देशातील वेगवेगळ्या खेड्यांत अशिक्षित आहेत. निवडणुकीच्या काळात, त्यांना अशा ठिकाणी आणले जाते जिथे नेते निवडणूक प्रचारासाठी येतात आणि तिथे ते मेंढरांसारखे गर्दी करताना दिसतात आणि बहुतेकदा त्या लोकांना रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसारखे भाड्याने आणले जात आणि मतदानादरम्यान, बहुतेक लोकांना आपण कोणाला मतदान करत आहोत हे समजत नाही, त्यांना फक्त हे चिन्ह दाबायचे आहे एवढेच समजते! बस.
आणि आज लोकं आपल्या गावाच्या आणि शहराच्या विकासाबद्दल कमी बोलतात आणि एकाच गावात सलोख्याने राहणाऱ्या गावकऱ्यांना कसे वेगळे करायचे आणि कश्याप्रकारे त्यांच्या मनात विष पेरायच याबद्दल अधिक बोलताना दिसतात. जे लोकं अनेक वर्षांपासून एकत्र जेवण करतात, एकमेकांचे सण साजरे करतात आणि अशा प्रकारे आनंदाने जगण्याचा प्रयत्न करताना दिसतात तर या लोकांच्या मनांमध्ये विष पसरवण्याचा काम या लोकांकडून होताना दिसते.
मात्र त्यांचा गावांचा किंवा शहराचा विकास मात्र ते करताना दिसत नाही, गाव आणि शहरे आणि तेथील सामान्य लोक दररोज आपल्याला प्रदूषणाच्या समस्यांशी झगडताना दिसतात. वेगवेगळे आजार त्यांना झालेले आहेत हे आपल्याला बघायला मिळते त्याचसोबत त्यांना चांगली रुग्णालये मिळत नाहीत. कित्येक लोकं आपल्याला रुग्णालयांच्या बाजूला थंडी मध्ये वगैरे कुडकुडत आणि वेदनेने तडफडत आहेत असं दृश्य आपल्याला रुग्णालयांच्या बाजूला बघायला मिळत . कित्येकदा कितीही प्रयत्न केले तरी त्यांना रुग्णालयांमध्ये साधा उपचार करण्यासाठी सुद्धा आत जाता येत नाही आणि त्यानंतर त्यांची परिसथिती आणखी गंभीर होताना दिसते .
तर अशा अनेक समस्यांसोबत लोकं दररोज झगडताना बघायला मिळतात आणि आपण जरी नवीन वर्षात प्रवेश केला असला तरी, लोकांच्या समस्या तशाच आहेत आणि या समस्यांवर काम करणाऱ्या लोकांचं लक्ष देण्याची गरज असते. मात्र लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि आपल्याच गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खूप कमी लोक प्रामाणिकपने काम करताना दिसतात, हे आपण पाहतो आणि अनुभवतो.







