सध्याचे शहरांतील आणि तालुक्यातील रस्ते आपण बघितले आणि त्यावर असणारी प्रचंड वाहनांची गर्दी बघितली, जिथे लोकांना दाटीवाटीने आपली वाहणे पुढे ढकलत न्यावी लागतात. शहरातील आणि तालुक्याच्या ठिकाणी जेव्हा लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि शहरे आणि तालुके जेव्हा लोकांच्या लोंढ्यांनी दररोज फुगत आहेत आणि वाहनांची प्रचंड गर्दी जेव्हा आपल्याला अनुभवायला मिळते तेव्हा वाटत की आपली ही सध्याची रस्ते ह्या गर्दी साठी पुरणार नाहीत ती अतिशय छोटी पडायला लागली आहेत.
त्यामुळे या गर्दीत लोकांना कित्येकदा खूप वेळ उभ रहाव लागतं, त्याच बरोबर अनेकांना प्रचंड त्रासाला सामोरे जाव लागतं, कित्येकदा आपल्याला बघायला मिळते की अश्या रस्त्यांवर लोकांना पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आणि अश्या प्रचंड गर्दीत शहरातील किंवा तालुक्यातील रस्त्यांवरून अनेक अवजड वाहने सातत्याने ये जा करत आहे; आणि या मोठ्या वाहनांमुळे आणखी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे अस निदर्शनास येत.
त्यामुळे छोट्या आणि मध्यम आकाराच्या वाहनांना आपली वाहणे सामोरे काढण्यास त्रास होतोय आणि लोकांना सुद्धा त्यामुळे ये जा करण्यास त्रास होतोय. त्यामुळे छोट्या आणि मध्यम आकाराची वाहने, लोकांची गर्दी आणि अवजड वाहने त्या रस्त्यावर एकत्र आल्यामुळे आणि रस्ते छोटे पडल्यामुळे, प्रचंड वाहतूक कोंडी होतांना लोकांना अनुभवास पडते. त्याचबरोबर, रस्त्याला अगदी चिपकून असलेली अनेक छोटी मोठी दुकाने दोन्ही बाजूला असल्यामुळे तिथे रस्त्याचा बाजूला आणखी गर्दी आढळते.
मात्र ज्या प्रकारे शहरे आणि तालुके फुगत आहेत त्यावरून आपल्याला कळते की आता ही रस्ते ह्या वेगाने वाढणार्या लोकसंख्ये साठी पुरेशी पडणार नाही. तेव्हा आपल्या कडील रस्त्यांच रुंदीकरण होणे महत्वाच आहे अस वाटून जात किंवा बाकीच्या विकसित देशातील ज्या काही चांगल्या गोष्टी किंवा तंत्रज्ञान ते लोकं आत्मसात करतात आणि तिथल्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजतात ते आपल्याकडे सुद्धा उपयोगात आणले तर लोकांच जीवन आणखी सुखकर आणि तणावमुक्त होऊ शकतं.
रस्ते अधिक रुंद असतिल किंवा आपल्याकडे अधिक च्या मेट्रो रेल्वे वर्दळीच्या रस्त्यांवरून धावत असेल तर लोकांचा त्रास कमी होईल आणि ज्या ज्या देशांनी किंवा त्यांचे अश्या प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी जे काही उपाय आणि मार्ग शोधले असतिल ते आम्ही जर का उपयोगात आणले तर त्याचा आपल्या लोकांना आणि शहराला आणखी सुंदर आणि नियोजनबद्ध बनविण्यात मोठा फायदा होईल.
त्याचबरोबर जर का आपल्या कडे आपल्या शहरांमध्ये किंवा तालुक्याचा ठिकाणी अवजड वाहनांमुळे रस्त्यांची कोंडी होऊन लोकांना त्रास सहन करवा लागत असेल
तर अश्या अवजड वाहनांना वेगळया मार्गाने वळवल्याने कित्येकदा वाहतूक कोंडी सोडविता येऊ शकते त्यामुळे वाहतूक कोंडी कदाचित कमी होऊ शकते आणि लोकांचा त्रास कमी होऊ शकतो. आज जेव्हा शहरे फुगत आहेत, तालुके सुद्धा गर्दी ने फुगत आहेत तर या वर योग्य उपाय शोधणे आज आवश्यक आहे अस वाटतं.







