गावातील शेतकर्यांच्या जमिनी आम्ही वाचवू शकत नाही. गावातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या जमिनी आणि त्यांचे उद्योगधंदे आम्ही वाचवू शकत नाही. ही समस्या आज सगळी कडे आहे.
आंधळे बनून आम्ही जगत आहो आज अशी परिस्थिती आहे. गावातील लोकांच्या शेत्या बाहेरच्या लोकांकडून अव्वाच्या सव्वा भावात विकत घेतल्या जातात आणि तिथे मोठ मोठाले प्रकल्प आणि उद्योग उभे राहतात आणि ज्यांच्या शेत्या किंवा जमिनी होत्या ते गावात दारोदार भटकताना दिसतात. त्यांची मुलं बाळ रस्त्यावर आलेली दिसतात ही परिस्थिती असते.किंवा ज्यानी त्या जमिनी विकत घेतल्या तिथेच त्या कारखान्यांत आमच्या इकडची हजारो पोरं आज कामाला लागलेली दिसतात. काम त्यांच रोजंदारीवर सुरू असते ही समस्या मोठी असते.
काही काही गावातील अंगठे बहादूर सुद्धा आमच्या इकडे येऊन मोठा व्यवसाय उभारतात, कारखाने काढतात आणि आम्ही आमच्याच पोरांना जाती पातीच्या नावावर अनेको वर्षे खाली ओढत असतो. मग ते शिक्षणात ही मागे राहतात.
कोणत्या काम धंद्याला लागले तर तिथे सुद्धा त्यांना काय पुढे भविष्य नसते कारण कधी व्यवसाय चालवणारे व्यापारी आमच्या पोरांना बाहेर काढून फेकतील आणि बेरोजगार करतील आणि किती परिवारांना त्यामुळे उपाशी मराव लागेल याचा काही एक अंदाज नसतो.
मुली आणि स्त्रिया मग शासनाच्या योजनांद्वारे मिळणार्या तुटपुंज्या निधीतून काय करणार? मोठा प्रश्ण असतो! आता या अनेक शिकलेल्या स्त्रिया आणि मुली जेव्हा काहीच करू शकत नाही, ना त्यांच शिक्षण त्यांचा उपयोगी पडत तर मग या मुलींनी काय कराव? हा सुद्धा मोठा प्रश्ण निर्माण होतो त्या मुलींसमोर कधी त्या एखाद्या कारखान्यात तर कधी शेतात तर कधी विटाभट्टीवर कामाला लागलेल्या दिसतात आणि तिथे कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार अन्याय होतांना दिसतो.
मात्र कित्येक अन्याय ग्रस्त स्त्रियांचे आणि मुलींचे प्रश्न आणि समस्या समोर येत नाहीत आणि त्यांचा समस्या सोडवल्या जात नाही. ज्या मुली किंवा स्त्रिया शिकून सुद्धा त्यांच शिक्षण त्यांच्या कामी येत नाहीत तेव्हा शासनाच्या या तुटपुंज्या मिळणार्या निधीवर कस भागवून नेणार. आणि त्यातला जेव्हा काहीच करू शकत नाही तर मग त्या चुकीच्या मार्गावर लागतात आणि अनेकांचं त्यामुळे आयुष्य संपूर्णतः उध्वस्त होतांना आपल्याला बघायला मिळते. तर अश्या प्रकारची समस्या असते.
आपल्याच गावातील लोकं, आपल्याच गावात बेरोजगार, अशिक्षित, कुपोषित, गरीब, भिकारी, कर्जबाजारी आणि रोजगाराच्या शोधात दररोज ठेकरा खात असतात, अपमानित होत असतात. तर ही मोठी गंभीर समस्या असते. गावातील लोकांना जर अश्या भिकार परिस्थितीमध्ये जर जगावं लागत असेल तर त्याला जबाबदार कोण असते?
याला आपन सगळेच जबाबदार असतो. आपन आपल्याच लोकांत जातीपातीच्या नावावर विष पसरवत असतो. आपन आपल्याच लोकांचे पाय ओढत असतो. आपन त्यांच्या कामात आणि व्यवसायात अडथळे आणतो. शिक्षण घेऊन चांगले गुण मिळवून सुद्धा मुले रोजगारासाठी भटकतात अनेक वर्षे परिश्रम करून सुद्धा त्यांना कुठे रोजगार लागत नाही किंवा ते स्वत काही छोटा मोठा व्यवसाय किंवा धंदा सुरू करू शकत नाही किंवा केला तर तो चालू शकत नाही तर याला आपली मानसिकता जबाबदार असते. बाहेरच्या लोकांचे “लाड पुरवा आणि आपल्या लोकांचे रोजगार बुडवा,” त्यांचे पाय ओढा आणि त्यांना रोजगार मिळू देऊ नका?
अशी परिस्थित असते त्यामुळे मग, भिकारी, गरीब, अशिक्षित, पैसा पानी नसलेले लोकं पुढे काही करू शकत नाही, ना समोर आमच्या लोकांची आणि आमच्या गावांची आणि राज्याची भरभराट होत. त्यामुळे मग आमच्या लोकांना मुजरा करत, गुलामी करत आपल्याच राज्यात आणि आपल्याच गावात रहाव लागतं. तर ही परिस्थिती समजणे आज आवश्यक आहे .







