फक्त हा भाषा दिन आणि तो भाषा दिन साजरा करून काही फायदा होणार नाही. आपल्या देशी भाषा हळूहळू धोक्यात येत आहेत हे सत्य आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या भाषा धोक्यात आणण्याची आणि नष्ट करण्याची जबाबदारी आपणच घेतली आहे असं, आज आपण आपल्या सभोवतालच्या परिसरात किंवा समाजात फिरतो तेव्हा याची जाणीव आपल्याला होते.
आज शाळा-महाविद्यालयांमध्ये आपल्या भाषा शेवटी शिकवल्या जातात आणि त्याही औपचारिकतेसाठी आणि इंग्रजी भाषेला वरचे स्थान दिले जाते.
यामध्ये त्या लोकांचं काही नुकसान होणार नाही ज्यांची इंग्रजी हि मातृभाषा आहे मात्र त्या लोकांचं नुकसान मात्र नक्की होईल ज्यांची हि मातृभाषा नाही आणि जे हळहळू आपली भाषा विसरत चाललेले आहे. काही वर्षात आपल्या भाषांची परिस्थिती हळूहळू खराब होत जाईल आणि परदेशी भाषेला अश्या प्रकारे प्रचंड प्रमाणात समर्थन मिळत राहिलं तर आपल्या भाषांची परिस्थिती हळहळू वाईट होत जाईल आणि शेवटी त्यांचं अस्तित्व धोक्यात येऊन जाईल.
परकीय भाषा शिकून जर आपण लिहू किंवा बोलू लागलो तर त्या लोकांना नेहमीच अभिमान वाटेल आणि ते आपला पाउलापाउला वर अपमान करत राहतील आणि भविष्यात आपण आपल्या भाषा विसरल्यामुळे, आपण आपल्याच लोकांना अडचणीत आणण्याचे परिणाम भोगत राहू.
आणि त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. आजकाल मुलं शाळांमध्ये इंग्रजीत शिकतात, पण आजही आपल्या आजूबाजूच्या वातावरणाकडे बघितलं तरी देशी भाषेचा सुगंध दरवाळताना आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतो.
कुठेही जा, कुठेही बसा, शेतात जा, शेतकऱ्यांना भेटा, रस्त्यावर फिरू, वाहनात फिरू, मजुरांना भेटू, हॉटेलमध्ये जा, दुकानात जा, भाजी मंडईत जा, महिलांना भेट, मुलींना भेटा, शाळेत जाणाऱ्या मुलांना भेटा, काम करणाऱ्या मातांना भेटा या वेळी तुम्हाला आपल्या देशाच्या मातीचा गंध आता सुद्धा निराळा आहे आणि हवाहवासा आहे.
यूपीमध्ये जा, बिहारमध्ये जा, राजस्थानमध्ये जा, पंजाबमध्ये जा, दक्षिणेत जा किंवा महाराष्ट्रात जा, मजा येते, लोकांना अजूनही त्यांच्या भाषा आवडतात, पण परकीय भाषांना असाच पाठिंबा मिळत राहिला तर. येत्या काही वर्षांत भारत विकसित होईल, असे पंतप्रधान मोदीजी म्हणाले होते.
तोपर्यंत देशाचा विकास होईल की नाही हे माहीत नाही, पण जो काही वर्षाचा आकडा मोदीजींनी सांगितला आहे, म्हणजे तो पर्यंत देश विकसित होईल असं मोदीजी म्हणाले आहेत , मात्र भीती अशी आहे कि तोपर्यंत आपल्या अनेक भाषा मोठ्या संकटात सापडलेल्या असतील किंवा त्या नामशेष झाल्या असतील, यात काही शंका नाही.
त्यामुळे आज आपल्या भाषा वाचवणे महत्त्वाचे आहे, हे आम्ही आज सर्व लोकांनी आणि समाजातील सर्व युवकांनी समजून घेतले पाहिजे.